spot_img
ब्रेकिंगकोण कोणामुळे निवडून आले? उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टच म्हणाले, निवडून येणार्‍याला..

कोण कोणामुळे निवडून आले? उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टच म्हणाले, निवडून येणार्‍याला..

spot_img

पुणे। नगर सहयाद्री-
राष्ट्रवादीचे नेत्या सुप्रिया सुळे व शिरूरचे खा. अमोल कोल्हे हे दोघे अजित पवारांमुळे निवडून आल्याची चर्चा सध्या गाजत आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, निवडून येणार्‍याला माहितीय कोण कोणामुळे निवडून आले अन् निवडून आणणार्‍यालाही माहितीय कोण कोणामुळे निवडून आले, असे सांगत त्यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला.

अभियांत्रिकी महाविद्यालयाची पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, राज्य मागासवर्गीय आयोग हे स्वायत्त आहे आणि त्यांच्यावर कुठलाही दबाव नाही. आम्ही हस्तक्षेप करत नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम मांसाहारी होते, असे विधान केले होते. त्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

‘अजित पवार पक्षात असताना दमदाटी करत होते’ या आव्हाड यांच्या वक्तव्यावर पवार म्हणाले, मी कामाचा माणूस आहे. सकाळी सहाला कामाला सुरूवात करतो. मी असले आलतू-फालतू उत्तरं द्यायला बांधील नाही. किरकोळ किरकोळ प्रश्न ज्याला काही अर्थ नाही, दोन दिवस चघळायचे-चघळायचे अन त्याचा चोथा करायचा.

राज्यात कोविड वाढू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे. मागील वेळेस सगळ्यांनी कर्तव्य बजावत सहकार्य केले होते. आताच्या कोविडमध्ये तीव्रता फार नाही. आम्ही अजून मास्क वापरायला सुरुवात केली नाही. आम्ही पण मास्क वापरला पाहिजे ते सत्य आहे, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...