spot_img
महाराष्ट्रमराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले? आरटीआयच्या माध्यमातून उघड झाली धक्कादायक...

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले? आरटीआयच्या माध्यमातून उघड झाली धक्कादायक माहिती

spot_img

नगर सह्याद्री / जालना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले होते.

तिथे पोलिसांकडून लाठीमार झाला होता. या घटनेनंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. यावेळी राज्याचे गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे टार्गेट केले गेले.

गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केल्याचा आरोपही करण्यात आला होता. दरम्यान, आरटीआयकडून मागवलेल्या माहितीतून यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत अशी माहिती आता आरटीआय मधून समोर आली आहे.

जालना जिल्हा जनमाहिती अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक (गृह) आर.सी. शेख यांनी ही माहिती दिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी ही माहिती मागितल्यानंतर ही माहिती समोर आली होती. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी हल्ला केला. अनेक आंदोलक जखमी झाले. या झटापटीत अनेक पोलीसही जखमी झाले आहेत. लाठीमारानंतर मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र झाले.

लाठीमाराच्या आदेशांसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोषी ठरवण्यात येत होते. देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले होते. दरम्यान, माहिती अधिकाराद्वारे समोर आलेल्या माहितीमुळे देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Parner: खासदार विखे शेतकऱ्यांच्या बांधावर! म्हणाले, शेतकऱ्यांना..

पारनेर। नगर सह्याद्री- तालुक्यातील महसूल व कृषी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे करताना कोणत्याही अडचणी येऊ...

Ahmednagar: सैनिकाला मारहाण..; नगरच्या ‘या’ भागात ‘धक्कादायक’ प्रकार

अहमदनगर | नगर सह्याद्री- सैनिकाच्या पत्नी विषयी समाजात वाईट बोलून त्यांची बदनामी केली. याबाबत जाब...

‘महसूलमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातुन तीन कोटी निधी’

सागर मैड यांची पत्रकार परिषदेत माहिती सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील सुपा गावात येत्या काळात...

…म्हणून प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना महत्व, जाणून घ्या सविस्तर

नगर सहयाद्री टीम- प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना फार महत्व दिले जात होते. बाजारात चककणारी व...