spot_img
महाराष्ट्रमराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले? आरटीआयच्या माध्यमातून उघड झाली धक्कादायक...

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले? आरटीआयच्या माध्यमातून उघड झाली धक्कादायक माहिती

spot_img

नगर सह्याद्री / जालना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले होते.

तिथे पोलिसांकडून लाठीमार झाला होता. या घटनेनंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. यावेळी राज्याचे गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे टार्गेट केले गेले.

गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केल्याचा आरोपही करण्यात आला होता. दरम्यान, आरटीआयकडून मागवलेल्या माहितीतून यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत अशी माहिती आता आरटीआय मधून समोर आली आहे.

जालना जिल्हा जनमाहिती अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक (गृह) आर.सी. शेख यांनी ही माहिती दिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी ही माहिती मागितल्यानंतर ही माहिती समोर आली होती. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी हल्ला केला. अनेक आंदोलक जखमी झाले. या झटापटीत अनेक पोलीसही जखमी झाले आहेत. लाठीमारानंतर मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र झाले.

लाठीमाराच्या आदेशांसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोषी ठरवण्यात येत होते. देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले होते. दरम्यान, माहिती अधिकाराद्वारे समोर आलेल्या माहितीमुळे देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...