spot_img
आरोग्यगायीचं की म्हशीचं? कोणतं तूप आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या एका क्लिकवर...

गायीचं की म्हशीचं? कोणतं तूप आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या एका क्लिकवर…

spot_img

नगर सह्याद्री टीम :
आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी तुपाचे फायदे सांगणार आहोत. तूप खाण्याचे शौकीन तुम्ही असाल तर तुमच्या मनात एक प्रश्न तर नक्कीच आला असेल, ‘सर्वात फायदेशीर तूप कुणाचे ? गाय की म्हैस?’ तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हे चांगले आहे.

न्यूट्रीशनिस्ट काय म्हणतात

तज्ज्ञ न्यूट्रीशनिस्ट हिमांशू राय सांगतात की, साधारणपणे गाईचे तूप आणि म्हशीचे तूप दोन्ही चांगले असतात, पण गाईच्या तुपाच्या सेवनाने अधिकाधिक आणि चांगले आरोग्य फायदे मिळतात. गाईच्या तुपात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि के, कॅल्शियम, मिनरल्स, पोटॅशियम आणि फॉस्फरस तसेच अँटीऑक्सिडंट्स असतात, एवढेच नाही तर गाईच्या तुपात ओमेगा 9 फॅटी अॅसिडही असते.

 म्हैस आणि गाईचे तूप यात फरक

– म्हशीच्या तुपामध्ये गाईच्या तुपापेक्षा जास्त चरबी असते. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी म्हशीचे तूप उत्तम आहे, तर गाईचे तूप कमी चरबीयुक्त असल्याने वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

– गाईच्या तूपात ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर असते, त्यामुळे त्याचा रंग पिवळा असतो, तर म्हशीच्या तूपाचा रंग पांढरा असतो.

– आयुर्वेदिक औषधांमध्ये म्हशीच्या तुपाच्या तुलनेत गाईचे तूप डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर मानले जाते.

गाईच्या तुपाचे फायदे

वजन कमी करण्यास उपयुक्त

डोळ्यांसाठी फायदेशीर

पोटाची उष्णता शांत करण्यास उपयुक्त

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त

मायग्रेन किंवा डोकेदुखीच्या समस्येपासून आराम

शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते

म्हशीच्या तुपाचे फायदे

वजन वाढण्यास उपयुक्त

याच्या सेवनाने हाडे आणि स्नायू मजबूत होतात.

मानसिक आजार बरे करण्यासाठी फायदेशीर.

म्हशीचे दूध स्मरणशक्ती सुधारते.

हे वात दोष संतुलित करते.

पचनाचे विकार दूर होतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...