spot_img
ब्रेकिंगआचार संहिता कधी लागणार? अजित पवार यांचं मोठं विधान

आचार संहिता कधी लागणार? अजित पवार यांचं मोठं विधान

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुक आयोगाने देखील तयारी सुरु केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही तारीख झालेली नाही. महाराष्ट्रात निवडणुका कधी होणार? आचार संहिता कधी लागणार? याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तसेच येत्या दहा दिवसात अनेक जण पक्ष बदलतील असेही अजित पवार म्हणाले.

येत्या दोन तीन दिवसात आचारसंहिता लागू होईल. दिवाळी नंतर निवडणुका होतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. सगळेच जण उमेदवार जाहीर करतील. आयाराम गयाराम ही जोरात आहेत. येत्या दहा दिवसात अनेकजण पक्ष बदलताना आपल्याला दिसतील असं मोठ विधान देखील अजित पवार यांनी केले आहे.

महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत. महायुती आणि मविआमध्ये जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मविआमध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात जागावाटपावरून वाद सुरू आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये देखील अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचितनं 11 उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतलीय.

विधानसभा निवडणुकांचा वेध सर्वच पक्षांना लागला आहे आता आचारसंहिता कधी लागणार याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागलंय. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलंय.विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केलीय. त्याचबरोबर निवडणूक आयोग देखील कामाला लागला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशीतील जातकांना लाभदायक ‘गुरुवार’

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य खूप अल्पसे अडथळे येतील-परंतु दिवसभरात खूप काही यश...

नगर शहरातील तीन समाजकंटक हद्दपार; वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सह्याद्री ​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली...

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार...

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...