spot_img
ब्रेकिंगएसीत बसणाऱ्यांना 'ती' झळ काय कळणार?; मनोज जरांगे यांचे राज ठाकरे यांना...

एसीत बसणाऱ्यांना ‘ती’ झळ काय कळणार?; मनोज जरांगे यांचे राज ठाकरे यांना प्रत्यूत्तर, वाचा सविस्तर..

spot_img

Manoj Jarange Patil: राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे, तर दुसरीकडे विधानसभेसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूरच्या दौऱ्यावर असताना “कशाला हवंय आरक्षण?” या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंनी प्रत्यूत्तर देत म्हटले की, “त्यांना आरक्षण नकोय, पण बाकीच्यांना हवंय.”

मनोज जरांगेंनी असा प्रश्न उपस्थित केला की, “राज ठाकरेंच्या गाडीवर सुपारी फेकणारी मंडळी कोण होती हे मी पाहिलं नाही, पण राज्यात कुठेही आंदोलन सुरु नाही. फडणवीसांसारखे सुपारी घेतल्यासारखं आंदोलन करणं आणि यात्रा काढणं बंद करा. आम्ही मुंबईला जाऊन जाब विचारू शकतो. समाजात ताकद आहे.” “गाड्या फोडणाऱ्यांच्या विचारांना थोडंच राज्य चालतं. दंगली होणार नाहीत. आम्हाला कोणीही कोणत्या पक्षाचा आहे असं म्हटलं जातं, पण मराठा समाजाकडून राज्यात कोणताही आंदोलन सुरू नाही.”

पुढे बोलतांना जरांगे म्हणाले, “राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही, बाकीच्यांना आहे. गोरगरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे. जे त्यांना वैभव मिळालं ते मराठ्यांच्या जीवावर मिळाले. एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची झळ कळणार नाही. गोरगरिबांच्या भावना जाणून घ्या. प्रत्येक वेळी तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...