spot_img
ब्रेकिंगPolitics News: लोकसभा निवडणुकीत काय होईल? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही! अजित...

Politics News: लोकसभा निवडणुकीत काय होईल? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही! अजित पवार यांच्या विधानाची जोरदार चर्चा

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीत काय होईल? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. बीड, जालना, परभणी या जिल्ह्यात जातीयवादावर निवडणूक झाली. मराठा आणि इतर समाज असे काही वातावरण गावात पाहायला मिळाले असे मत देखील अजित पवारांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

अजित पवार यांनी महाविकास आघाडीत असताना शिवसेनेचा कार्यक्रम करायला सांगितले जायचे असे म्हटले आहे. महाविकास आघाडीत आम्ही ज्यावेळी एकत्र काम करायचो तेव्हा आम्हाला शिवसेनेबाबत टोकाची भूमिका घ्या असे सांगितले जायचे. मग मी त्यांना का असे विचारायचो? तर ते म्हणायचे की, शिवसेनेबाबत टोकाची भूमिका घेतल्यावर अल्पसंख्यांकाना समाधान मिळते. मात्र, या निवडणुकीत अल्पसंख्यांक ठाकरे गटासोबत जायला निघाला होता. काय कुठं कसं गणित बदलंत. यावेळेस काय होणार? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.

पुढे अजित पवार म्हणाले, बीड, जालना, परभणी या जिल्ह्यात जातीयवादावर निवडणूक झाली. मराठा आणि इतर समाज असे काही वातावरण गावात पाहायला मिळाले. देश कुठं चाललाय? जग कुठं चाललोय? आपण जातीपातीमध्ये अडकून बसला आहे. असेही ते यावेळी म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला तरी त्यांचा उन्माद होऊ द्यायचा नाही.

पराभव झाला तरी कोणीही खचून जायचे नाही. हे राजकारणात सर्वांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत होणार नाही. आपला कोणताही कार्यकर्ता आणि पदाधिकारी नाराज होणार नाही, अशा सन्मानजनक जागा आपल्याला नक्की मिळतील, असेही अजित पवार म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

द्राक्षाचा गोडवा वाढला! कीलोला किती रुपयांचा दर?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव,घारगाव ,कोळगाव, वडळी, आढळगाव, कोकणगाव, हिरडगाव, बेलवंडी कोठार,...

वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रियसीला संपवलं; रेड लाईट परिसरात प्रियकराच भयंकर कृत्य!

मुंबई । नगर सहयाद्री चारित्र्यावर संशय घेत प्रियकरानं वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या महिलेची हत्या...

रखरखत्या उन्हात पडणार रिमझिम धारा, हवामानात होणार बदल!

मुंबई । नगर । सहयाद्री:- देशभरात सध्या हवामानामध्ये सतत बदल होत असून, तापमानाचा अंदाज...

कोतवाली पोलिसांची कामगिरी; ५ वर्षांची हरवलेली चिमुकली ४० मिनिटात सापडली..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- १४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता, केडगाव परिसरातील रोशन कुमार...