spot_img
ब्रेकिंगPolitics News: लोकसभा निवडणुकीत काय होईल? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही! अजित...

Politics News: लोकसभा निवडणुकीत काय होईल? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही! अजित पवार यांच्या विधानाची जोरदार चर्चा

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीत काय होईल? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. बीड, जालना, परभणी या जिल्ह्यात जातीयवादावर निवडणूक झाली. मराठा आणि इतर समाज असे काही वातावरण गावात पाहायला मिळाले असे मत देखील अजित पवारांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

अजित पवार यांनी महाविकास आघाडीत असताना शिवसेनेचा कार्यक्रम करायला सांगितले जायचे असे म्हटले आहे. महाविकास आघाडीत आम्ही ज्यावेळी एकत्र काम करायचो तेव्हा आम्हाला शिवसेनेबाबत टोकाची भूमिका घ्या असे सांगितले जायचे. मग मी त्यांना का असे विचारायचो? तर ते म्हणायचे की, शिवसेनेबाबत टोकाची भूमिका घेतल्यावर अल्पसंख्यांकाना समाधान मिळते. मात्र, या निवडणुकीत अल्पसंख्यांक ठाकरे गटासोबत जायला निघाला होता. काय कुठं कसं गणित बदलंत. यावेळेस काय होणार? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.

पुढे अजित पवार म्हणाले, बीड, जालना, परभणी या जिल्ह्यात जातीयवादावर निवडणूक झाली. मराठा आणि इतर समाज असे काही वातावरण गावात पाहायला मिळाले. देश कुठं चाललाय? जग कुठं चाललोय? आपण जातीपातीमध्ये अडकून बसला आहे. असेही ते यावेळी म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला तरी त्यांचा उन्माद होऊ द्यायचा नाही.

पराभव झाला तरी कोणीही खचून जायचे नाही. हे राजकारणात सर्वांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत होणार नाही. आपला कोणताही कार्यकर्ता आणि पदाधिकारी नाराज होणार नाही, अशा सन्मानजनक जागा आपल्याला नक्की मिळतील, असेही अजित पवार म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...