spot_img
ब्रेकिंगPolitics News: लोकसभा निवडणुकीत काय होईल? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही! अजित...

Politics News: लोकसभा निवडणुकीत काय होईल? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही! अजित पवार यांच्या विधानाची जोरदार चर्चा

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीत काय होईल? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. बीड, जालना, परभणी या जिल्ह्यात जातीयवादावर निवडणूक झाली. मराठा आणि इतर समाज असे काही वातावरण गावात पाहायला मिळाले असे मत देखील अजित पवारांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

अजित पवार यांनी महाविकास आघाडीत असताना शिवसेनेचा कार्यक्रम करायला सांगितले जायचे असे म्हटले आहे. महाविकास आघाडीत आम्ही ज्यावेळी एकत्र काम करायचो तेव्हा आम्हाला शिवसेनेबाबत टोकाची भूमिका घ्या असे सांगितले जायचे. मग मी त्यांना का असे विचारायचो? तर ते म्हणायचे की, शिवसेनेबाबत टोकाची भूमिका घेतल्यावर अल्पसंख्यांकाना समाधान मिळते. मात्र, या निवडणुकीत अल्पसंख्यांक ठाकरे गटासोबत जायला निघाला होता. काय कुठं कसं गणित बदलंत. यावेळेस काय होणार? हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.

पुढे अजित पवार म्हणाले, बीड, जालना, परभणी या जिल्ह्यात जातीयवादावर निवडणूक झाली. मराठा आणि इतर समाज असे काही वातावरण गावात पाहायला मिळाले. देश कुठं चाललाय? जग कुठं चाललोय? आपण जातीपातीमध्ये अडकून बसला आहे. असेही ते यावेळी म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला तरी त्यांचा उन्माद होऊ द्यायचा नाही.

पराभव झाला तरी कोणीही खचून जायचे नाही. हे राजकारणात सर्वांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत होणार नाही. आपला कोणताही कार्यकर्ता आणि पदाधिकारी नाराज होणार नाही, अशा सन्मानजनक जागा आपल्याला नक्की मिळतील, असेही अजित पवार म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान कोसळले

नगर सह्याद्री वेब टीम Tejas fighter jet crashes: दुबईमध्ये एअर शो प्रात्यशिकात भाग घेतलेल्या तेजस...

आमदार-खासदारांशी कसं वागणार? सरकारचा कर्मचाऱ्यांना ९ कलमी कार्यक्रम…

आमदार-खासदारांच्या पत्रांना दोन महिन्यांत उत्तर देण्याचं अनिवार्य केलंय / नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई...

कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड; सयाजी शिंदे सरकारवरसंतापले? आम्ही मरायलाही तयार…

मुंबई / नगर सह्याद्री - सयाजी शिंदे हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी मराठी,...

रिक्षा थांबविण्याच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री येथील माळीवाडा बस स्थानक परिसरात रिक्षा थांबवण्याच्या किरकोळ वादातून दोन आरोपींनी...