spot_img
ब्रेकिंगमाजी महसूल मंत्र्यांनी खंडकऱ्याचे कोणते प्रश्न सोडविले? मंत्री विखे पाटलांचा निशाणा

माजी महसूल मंत्र्यांनी खंडकऱ्याचे कोणते प्रश्न सोडविले? मंत्री विखे पाटलांचा निशाणा

spot_img

राहाता । नगर सहयाद्री-
विरोधकांचा केवळ टीका करणे आणि राजकारण करणे हाच हेतू आहे. माजी महसूल मंत्र्यांनी खंडकऱ्याचे कोणते प्रश्न सोडविले? चांगले काम यांनी कोणते केले हे जनतेला त्यांनी सांगावे. अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील एकरूखे, रांजणगाव खुर्द, बाकडी आणि जळगाव येथे बुब कमिटी आणि कार्यकर्त्यांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुकुंदराव सदाफळ, ओंकार भवर, देवेंद्र भवर, जालिंदर गाढवे, भाजपाच्या महिला तालुकाध्यक्ष शोभाताई घोरपडे, सुवर्णा तेलोरे, राजेंद्र लहारे, कविता लहारे, संपतराव शेळके, भाऊसाहेब शेळके, रंजना लहारे, रोहिणी आहेर आदीसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

ना. विखे पाटील म्हणाले, पंतप्रधानांच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. देशातील ८० टक्के लोकांना मोफत धान्य योजनेचा लाभ मिळाला आहे. शेतकरी हिताच्या अनेक योजना केंद्र सरकारने सुरू केल्या. राज्य सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून एक रुपयात पीकविमा योजना तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रूपये अनुदान दिले आहे.

जिल्ह्यात नव्याने निर्माण होणाऱ्या औद्योगिक वसाहतीतून मोठी रोजगार निर्मिती होणार असून खंडकरी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सरकारच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत. विरोधकांचा केवळ टीका करणे आणि राजकारण करणे हाच हेतू आहे. माजी महसूल मंत्र्यांनी खंडकऱ्याचे कोणते प्रश्न सोडविले? चांगले काम यांनी कोणते केले हे जनतेला त्यांनी सांगावे. अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...