spot_img
ब्रेकिंगमाजी महसूल मंत्र्यांनी खंडकऱ्याचे कोणते प्रश्न सोडविले? मंत्री विखे पाटलांचा निशाणा

माजी महसूल मंत्र्यांनी खंडकऱ्याचे कोणते प्रश्न सोडविले? मंत्री विखे पाटलांचा निशाणा

spot_img

राहाता । नगर सहयाद्री-
विरोधकांचा केवळ टीका करणे आणि राजकारण करणे हाच हेतू आहे. माजी महसूल मंत्र्यांनी खंडकऱ्याचे कोणते प्रश्न सोडविले? चांगले काम यांनी कोणते केले हे जनतेला त्यांनी सांगावे. अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील एकरूखे, रांजणगाव खुर्द, बाकडी आणि जळगाव येथे बुब कमिटी आणि कार्यकर्त्यांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुकुंदराव सदाफळ, ओंकार भवर, देवेंद्र भवर, जालिंदर गाढवे, भाजपाच्या महिला तालुकाध्यक्ष शोभाताई घोरपडे, सुवर्णा तेलोरे, राजेंद्र लहारे, कविता लहारे, संपतराव शेळके, भाऊसाहेब शेळके, रंजना लहारे, रोहिणी आहेर आदीसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

ना. विखे पाटील म्हणाले, पंतप्रधानांच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. देशातील ८० टक्के लोकांना मोफत धान्य योजनेचा लाभ मिळाला आहे. शेतकरी हिताच्या अनेक योजना केंद्र सरकारने सुरू केल्या. राज्य सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून एक रुपयात पीकविमा योजना तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रूपये अनुदान दिले आहे.

जिल्ह्यात नव्याने निर्माण होणाऱ्या औद्योगिक वसाहतीतून मोठी रोजगार निर्मिती होणार असून खंडकरी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सरकारच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत. विरोधकांचा केवळ टीका करणे आणि राजकारण करणे हाच हेतू आहे. माजी महसूल मंत्र्यांनी खंडकऱ्याचे कोणते प्रश्न सोडविले? चांगले काम यांनी कोणते केले हे जनतेला त्यांनी सांगावे. अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...