spot_img
ब्रेकिंगमाजी महसूल मंत्र्यांनी खंडकऱ्याचे कोणते प्रश्न सोडविले? मंत्री विखे पाटलांचा निशाणा

माजी महसूल मंत्र्यांनी खंडकऱ्याचे कोणते प्रश्न सोडविले? मंत्री विखे पाटलांचा निशाणा

spot_img

राहाता । नगर सहयाद्री-
विरोधकांचा केवळ टीका करणे आणि राजकारण करणे हाच हेतू आहे. माजी महसूल मंत्र्यांनी खंडकऱ्याचे कोणते प्रश्न सोडविले? चांगले काम यांनी कोणते केले हे जनतेला त्यांनी सांगावे. अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील एकरूखे, रांजणगाव खुर्द, बाकडी आणि जळगाव येथे बुब कमिटी आणि कार्यकर्त्यांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुकुंदराव सदाफळ, ओंकार भवर, देवेंद्र भवर, जालिंदर गाढवे, भाजपाच्या महिला तालुकाध्यक्ष शोभाताई घोरपडे, सुवर्णा तेलोरे, राजेंद्र लहारे, कविता लहारे, संपतराव शेळके, भाऊसाहेब शेळके, रंजना लहारे, रोहिणी आहेर आदीसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

ना. विखे पाटील म्हणाले, पंतप्रधानांच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. देशातील ८० टक्के लोकांना मोफत धान्य योजनेचा लाभ मिळाला आहे. शेतकरी हिताच्या अनेक योजना केंद्र सरकारने सुरू केल्या. राज्य सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून एक रुपयात पीकविमा योजना तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रूपये अनुदान दिले आहे.

जिल्ह्यात नव्याने निर्माण होणाऱ्या औद्योगिक वसाहतीतून मोठी रोजगार निर्मिती होणार असून खंडकरी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सरकारच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत. विरोधकांचा केवळ टीका करणे आणि राजकारण करणे हाच हेतू आहे. माजी महसूल मंत्र्यांनी खंडकऱ्याचे कोणते प्रश्न सोडविले? चांगले काम यांनी कोणते केले हे जनतेला त्यांनी सांगावे. अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात बिबट्याची भीती; गावांना दिवसा वीज पुरवठा करावा

माजी सभापती अभिलाष घिगे, सरपंच भाऊसाहेब बहिरट यांची महावितरणकडे मागणी सुनील चोभे | नगर सह्याद्री गेल्या...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भिजतं घोंगडं; याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत मोठी...

कांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा…

रांधेतील शेतकर्‍याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट पारनेर | नगर सह्याद्री गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने...

अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय!; महाराष्ट्रात राजकारण तापले, माफीनामा अन कोण काय म्हणाले..

माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं सोलापूर | नगर सह्याद्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर...