spot_img
ब्रेकिंग..तर ठरलं! अखेर महायुतीचा तिढा सुटला, जागावाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा? मनसेला मिळणार..

..तर ठरलं! अखेर महायुतीचा तिढा सुटला, जागावाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा? मनसेला मिळणार..

spot_img

Lok Sabha Election 2024 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दिल्लीत महायुतीची रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती होती. बैठकीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब झाल्याची झाल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीच्या जागावाटपाबाबत तिन्ही पक्षातील नेत्यांना प्रश्न पडला होता. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मनसे देखील महायुतीत सहभागी होणार अशा चर्चा सुरू झाल्या. मनसे महायुतीसोबत आल्यास त्यांना किती जागा मिळणार? याकडे देखील अनेकांचं लक्ष लागून होते.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (ता. २३) रात्री दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक घेतली. बैठकमध्ये भाजप हा महायुतीत मोठा भाऊ असल्याने त्यांना लोकसभेच्या ३० जागा मिळणार आहे. त्यापाठोपाठ शिंदे गटाला १३ जागा, अजित पवार गटाला ४ जागा आणि राज ठाकरे यांच्या मनसेला १ जागा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मनसेला दक्षिण मुंबईतील जागा मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. बैठकीतील महत्वाची बाब म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ५ ते ६ जागांवर नवीन उमेदवार देण्यात यावेत, अशी चर्चाही झाली आहे. त्यामुळे शिंदे गटातून नेमकं कुणाचं तिकीट कापलं जाणार? याकडेही सर्वाचं लक्ष लागलं असून आज भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...