spot_img
अहमदनगरविखे-शिंदे संघर्ष संपला! सागर बंगल्यावर नेमकं काय घडलं, काय म्हणाले आमदार शिंदे..?...

विखे-शिंदे संघर्ष संपला! सागर बंगल्यावर नेमकं काय घडलं, काय म्हणाले आमदार शिंदे..? पहा सविस्तर

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खा. सुजय विखे व आ.राम शिंदे यांच्यात मोठा राजकीय संघर्ष आहे. मागील काही महिन्यांपासून विखे यांचा खुलेआम विरोध आ.शिंदे करत आहेत. परंतु याचा फटका लोकसभेला बसू शकतो हे विखे यांच्या ध्यानी आल्याने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सागर बंगल्यावर जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

त्यानंतर आता रविवारी रात्री (दि.२४) आमदार राम शिंदे यांनी सागर बंगल्यावर धाव घेतली. या बैठकीत स्वतः खा. सुजय विखे पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः होते. या दोघांमधील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मध्यस्ती करत असून त्यांची ’चाणय’नीती फलद्रुप होईल का हे पाहणे औत्सुयाचे ठरेल. या बैठकीनंतर आ.राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना काही मुद्दे या बैठकीतील स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले आ. राम शिंदे
मागील अनेक वर्षांपासूनचे विषय या बैठकीत मांडले. लोकसभेच्या निवडणुकीला आम्हाला उभे राहायचे होते. परंतु नेतृत्वाने उमेदवारीबात दुसरा निर्णय घेतला. मी भाजपचा कार्यकर्ता असल्याने नेतृत्वाने घेतलेला निर्णय मान्य आहे. परंतु या बैठकीनंतर अडचणीचं निराकरण झालं असल्याचे आ. राम शिंदे यांनी यावेळी म्हणाले. तसेच माझ्या मनातील प्रश्नांसाठी फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्ती केली असून हे दुःख कोणीतरी समजून घेतल असून यातच समाधान आहे व अशा नेतृत्वाचा आदेश मानला पाहिजे असे शिंदे म्हणाले.

आ. राम शिंदे यांची नाराजी संपली?
नाराजगीबाबत शिंदे म्हणाले, पक्षीय पातळीवर वाद मिटले असून वैयक्तिक मतभेद असले तरी निवडणुकीत ते काढायचे नसतात तर उलट पक्षाने दिलेला आदेश मानून लढायचे असते. आजची बैठक यशस्वी झाली असून गळाभेट झाली नाही, मात्र हस्तांदोलन झालं आहे असाही सूचक वक्तव्य आ. राम शिंदे यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...