spot_img
अहमदनगरविखे-शिंदे संघर्ष संपला! सागर बंगल्यावर नेमकं काय घडलं, काय म्हणाले आमदार शिंदे..?...

विखे-शिंदे संघर्ष संपला! सागर बंगल्यावर नेमकं काय घडलं, काय म्हणाले आमदार शिंदे..? पहा सविस्तर

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खा. सुजय विखे व आ.राम शिंदे यांच्यात मोठा राजकीय संघर्ष आहे. मागील काही महिन्यांपासून विखे यांचा खुलेआम विरोध आ.शिंदे करत आहेत. परंतु याचा फटका लोकसभेला बसू शकतो हे विखे यांच्या ध्यानी आल्याने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सागर बंगल्यावर जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

त्यानंतर आता रविवारी रात्री (दि.२४) आमदार राम शिंदे यांनी सागर बंगल्यावर धाव घेतली. या बैठकीत स्वतः खा. सुजय विखे पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः होते. या दोघांमधील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मध्यस्ती करत असून त्यांची ’चाणय’नीती फलद्रुप होईल का हे पाहणे औत्सुयाचे ठरेल. या बैठकीनंतर आ.राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना काही मुद्दे या बैठकीतील स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले आ. राम शिंदे
मागील अनेक वर्षांपासूनचे विषय या बैठकीत मांडले. लोकसभेच्या निवडणुकीला आम्हाला उभे राहायचे होते. परंतु नेतृत्वाने उमेदवारीबात दुसरा निर्णय घेतला. मी भाजपचा कार्यकर्ता असल्याने नेतृत्वाने घेतलेला निर्णय मान्य आहे. परंतु या बैठकीनंतर अडचणीचं निराकरण झालं असल्याचे आ. राम शिंदे यांनी यावेळी म्हणाले. तसेच माझ्या मनातील प्रश्नांसाठी फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्ती केली असून हे दुःख कोणीतरी समजून घेतल असून यातच समाधान आहे व अशा नेतृत्वाचा आदेश मानला पाहिजे असे शिंदे म्हणाले.

आ. राम शिंदे यांची नाराजी संपली?
नाराजगीबाबत शिंदे म्हणाले, पक्षीय पातळीवर वाद मिटले असून वैयक्तिक मतभेद असले तरी निवडणुकीत ते काढायचे नसतात तर उलट पक्षाने दिलेला आदेश मानून लढायचे असते. आजची बैठक यशस्वी झाली असून गळाभेट झाली नाही, मात्र हस्तांदोलन झालं आहे असाही सूचक वक्तव्य आ. राम शिंदे यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात बिबट्याची भीती; गावांना दिवसा वीज पुरवठा करावा

माजी सभापती अभिलाष घिगे, सरपंच भाऊसाहेब बहिरट यांची महावितरणकडे मागणी सुनील चोभे | नगर सह्याद्री गेल्या...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भिजतं घोंगडं; याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत मोठी...

कांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा…

रांधेतील शेतकर्‍याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट पारनेर | नगर सह्याद्री गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने...

अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय!; महाराष्ट्रात राजकारण तापले, माफीनामा अन कोण काय म्हणाले..

माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं सोलापूर | नगर सह्याद्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर...