spot_img
अहमदनगरविखे-शिंदे संघर्ष संपला! सागर बंगल्यावर नेमकं काय घडलं, काय म्हणाले आमदार शिंदे..?...

विखे-शिंदे संघर्ष संपला! सागर बंगल्यावर नेमकं काय घडलं, काय म्हणाले आमदार शिंदे..? पहा सविस्तर

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खा. सुजय विखे व आ.राम शिंदे यांच्यात मोठा राजकीय संघर्ष आहे. मागील काही महिन्यांपासून विखे यांचा खुलेआम विरोध आ.शिंदे करत आहेत. परंतु याचा फटका लोकसभेला बसू शकतो हे विखे यांच्या ध्यानी आल्याने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सागर बंगल्यावर जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

त्यानंतर आता रविवारी रात्री (दि.२४) आमदार राम शिंदे यांनी सागर बंगल्यावर धाव घेतली. या बैठकीत स्वतः खा. सुजय विखे पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः होते. या दोघांमधील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मध्यस्ती करत असून त्यांची ’चाणय’नीती फलद्रुप होईल का हे पाहणे औत्सुयाचे ठरेल. या बैठकीनंतर आ.राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना काही मुद्दे या बैठकीतील स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले आ. राम शिंदे
मागील अनेक वर्षांपासूनचे विषय या बैठकीत मांडले. लोकसभेच्या निवडणुकीला आम्हाला उभे राहायचे होते. परंतु नेतृत्वाने उमेदवारीबात दुसरा निर्णय घेतला. मी भाजपचा कार्यकर्ता असल्याने नेतृत्वाने घेतलेला निर्णय मान्य आहे. परंतु या बैठकीनंतर अडचणीचं निराकरण झालं असल्याचे आ. राम शिंदे यांनी यावेळी म्हणाले. तसेच माझ्या मनातील प्रश्नांसाठी फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्ती केली असून हे दुःख कोणीतरी समजून घेतल असून यातच समाधान आहे व अशा नेतृत्वाचा आदेश मानला पाहिजे असे शिंदे म्हणाले.

आ. राम शिंदे यांची नाराजी संपली?
नाराजगीबाबत शिंदे म्हणाले, पक्षीय पातळीवर वाद मिटले असून वैयक्तिक मतभेद असले तरी निवडणुकीत ते काढायचे नसतात तर उलट पक्षाने दिलेला आदेश मानून लढायचे असते. आजची बैठक यशस्वी झाली असून गळाभेट झाली नाही, मात्र हस्तांदोलन झालं आहे असाही सूचक वक्तव्य आ. राम शिंदे यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...