spot_img
अहमदनगरक्लासला गेली पण पुन्हा परतलीच नाही; रोडमिओंच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थीनीने घेतला'असा'निर्णय..

क्लासला गेली पण पुन्हा परतलीच नाही; रोडमिओंच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थीनीने घेतला’असा’निर्णय..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थीनीने १४ जून रोजी सकाळी टाकळीमिया परिसरात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. रोड रोमिओंच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यानुसार दोन अल्पवयीन मुलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील विद्यार्थीनीने नुकतेच ११ वी वर्गात प्रवेश घेऊन महाविद्यालयीन शिक्षण सुरु केले होते. ती क्लासला जात येत असताना काही रोड रोमिओ तिची छेड काढत होते. याबाबत तिने आईला सांगितले होते. त्यावेळी तिच्या आईने सदर रोड रोमिओंना भेटून माझ्या मुलीची छेडछाड करू नका, तिला त्रास देऊ नका, तिला परत फोन करू नका, अशी समज दिली होती. त्यानंतरही रोड रोमिओंच्या छेडछाडीचा त्रास सुरुच होता. ती या त्रासाला पूर्णपणे कंटाळली होती. १४ जून रोजी सकाळी जागृती ही क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली आणि तालुक्यातील टाकळीमिया शिवारातील रेल्वे बोगद्याजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थीनीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून देवळाली प्रवरा येथील दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच राहुरी पोलीस पथकाने दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिलेसोबत वाद केला, तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला अन् हत्यारांसह जेरबंद झाला; नेमकं काय घडलं..

Ahmednagar Crime News: महिलेसोबत वाद करून तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या तरूणाच्या कारमध्ये धारदार...

कुणाला शुभफल, कुणाला अडथळे..? सोमवारचा दिवस कसा जाईल? वाचा, आजचे राशी भविष्य!

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य विनाकारण संशय नात्याला खराब करण्याचे काम करते....

नगर जिल्ह्यातील ‘ते’ धरणं तुडूंब! कुठल्या धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- नगर जिल्ह्यातील शेती, व्यापार, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांना वरदान ठरलेल्या...

विधानसभेला जोरका झटका देणार, महायुतीचे काम नाही करणार?, नगच्या राजकारणात नेमकं शिजतंय काय?, कोणी केलं वक्तव्य..

Politics News: श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा राखीव असून येथे आरपीआयला उमेदवारी मिळावी. कारण गेल्या...