spot_img
अहमदनगर'नगरच्या १२ गावात मार्च महिन्यातच पाणी-बाणी'; नाराज जनतेनेची ‘मोठी’ मागणी?

‘नगरच्या १२ गावात मार्च महिन्यातच पाणी-बाणी’; नाराज जनतेनेची ‘मोठी’ मागणी?

spot_img

जलजीवनचे कामे निकृष्ट । पाण्यासाठी महिलांना पायपीट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: –
मार्च महिन्यातच राज्य पाणी टंचाईकडे वाटचाल करतंय. अनेक जिल्ह्यात आतापासून टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय. आता पाणीटंचाईच्या झळा अहिल्यानगरला बसायला सुरवात झाली आहे. नगरच्या १२ गावांमध्ये मार्च महिन्यातच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. तर लाखो रुपयांचे जलजीवन मिशनचे कामे निकृष्ट झाल्याचा आरोप नागरिक करत आहे. तर काही ठिकाणी पाणी ट्रॅकर सुरु करण्याची मागणी केली जात आहे.

मार्च महिन्याच्या सुरवातीलाच काही गावामध्ये पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. नगर तालुक्यातील बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, नारायण डोह, मदडगाव, बालेवाडी, सांडवे, हिवरे झरे आणि जेऊर गावच्या आजूबाजूच्या वाड्या- वस्त्या अशा बारा गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. तर मदडगावात पाण्यासाठी महिलांना १४ किलोमीटर अंतरावर पायपीट करत वणवण करावी लागत आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.

वापरण्याचे पाणी हे एका तळ्यातून आणण्यात येत आहे. मात्र त्याचा दर्जा अतिशय खराब असल्याने ते वापरण्याच्याही लायकीचे नाही तर पिण्यास देखील योग्य नसल्याचे सांगितले जात आहे. तर काही गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे झालेली आहेत. मात्र ती अतिशय निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप करत शासनाचे कोट्यवधी रुपये यात वाया गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे दरवर्षी या गावाला पाण्यासाठी झगडावे लागत आहे. आता गावांसाठी पाण्याचे ट्रॅकर सुरु करावे तसेच ट्रॅकर मंजुरीची प्रक्रिया वेगाने करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...