spot_img
महाराष्ट्र२६/११ हल्ल्यावरून वडेट्टीवारांचा मोठा गौप्यस्फोट; बावनकुळे म्हणाले थोडी तरी लाज बाळगा

२६/११ हल्ल्यावरून वडेट्टीवारांचा मोठा गौप्यस्फोट; बावनकुळे म्हणाले थोडी तरी लाज बाळगा

spot_img

नागपूर / नगर सह्याद्री :

लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात प्रचार सुरु आहे. अशातच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवर यांनी खळबळ जनक विधान केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि भाजप मध्ये चांगलीच जुपली आहे.

काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कसाब आणि उज्ज्वल निकम यांच्याबाबत दावा केल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्ष काँग्रेस नेत्यावर हल्लाबोल करत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्यावर हल्ला चढवला आहे. काँग्रेसचे नेते पाकिस्तानचीच भाषा बोलत आहेत, असं बावनकुळे म्हणाले आहेत. यासोबतच त्यांनी काँग्रेसवर दहशतवाद्यांसाठी अश्रू ढाळल्याचा आरोप केला.

बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ ट्विट करून लिहिले की, “विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली. वडेट्टीवार यांच्या नव्या ‘जावईशोध’ नुसार, शहीद हेमंत करकरे यांच्यावर झाडलेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती. निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपला विरोध करण्यासाठी तुम्ही २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा. असेही बावनकुळे म्हणाले.

बावनकुळेंनी लिहिले की, “मोदीजी सत्तेत आल्यापासून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे, पण आज काँग्रेस दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असताना याकुबच्या कबरीवर सुशोभीकरण केलं. आता कसाबचा पुळका आला आहे. काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....