spot_img
ब्रेकिंगWeather Update: ‘ राज्यात 'अवकाळी' पावसाचे थैमान! हवामान विभागाचा पुन्हा इशारा, 'या'...

Weather Update: ‘ राज्यात ‘अवकाळी’ पावसाचे थैमान! हवामान विभागाचा पुन्हा इशारा, ‘या’ भागात..

spot_img

Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस होत असल्याने आतापर्यंत लाखोंचा नुकसान झाला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना देखील मोठा फटका बसत आहे. यातच आता पुन्हा एकदा राज्यातील विदर्भात वादळी पाऊस, गारपिटीचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर काही भागात तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील ‘या’ जिल्ह्याना पावसाचा अलर्ट
मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दक्षिण छत्तीसगडपासून विदर्भ, वरील चक्राकार वारे, कर्नाटक ते दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.

राज्यातील तापमानाची ४३.६ अंश सेल्सिअस नोंद
राज्यातील उच्चांकी ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान ४० अंशांच्या पार असून, तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची वाढ झाल्याने वाशीम, अकोला, धुळे, गडचिरोली, वर्धा येथे तापमान ४२ अंशांच्या वर आहे. मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामानाचा तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.

२२ एप्रिलचे नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये)
पुणे ३७.८, धुळे ४२.०, जळगाव ३९.२, छत्रपती संभाजीनगर ३८.२, परभणी ४०.२, अकोला ४२.२, अमरावती ४१.४, बुलडाणा ३७.६, निफाड ३७.३, सांगली ३८.५, सातारा ३८.७, सोलापूर ३९.२, सांताक्रूझ ३३.८, डहाणू ३४.९, रत्नागिरी ३४.५, ब्रह्मपुरी ४१.८, चंद्रपूर ४१.४, गडचिरोली ४२.०, गोंदिया ३९.८, नागपूर ४०.६, वर्धा ४२.०, वाशीम ४३.६, यवतमाळ ४०.५. कोल्हापूर ३७.०, महाबळेश्वर २९.९, मालेगाव ३९.२, नाशिक ३६.१,

राज्यात ‘अवकाळी’ पावसाचे थैमान?
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल ८५३ गावांना फटका बसला आहे. यामुळे येथील १५ हजार शेतकऱ्यांचे आठ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके बाधीत झाली आहे. शिवाय वीज पडून तब्बल १७ जणांचा मृत्यू आणि ३२ जण जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...