spot_img
ब्रेकिंगWeather Update: ‘ राज्यात 'अवकाळी' पावसाचे थैमान! हवामान विभागाचा पुन्हा इशारा, 'या'...

Weather Update: ‘ राज्यात ‘अवकाळी’ पावसाचे थैमान! हवामान विभागाचा पुन्हा इशारा, ‘या’ भागात..

spot_img

Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस होत असल्याने आतापर्यंत लाखोंचा नुकसान झाला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना देखील मोठा फटका बसत आहे. यातच आता पुन्हा एकदा राज्यातील विदर्भात वादळी पाऊस, गारपिटीचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर काही भागात तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील ‘या’ जिल्ह्याना पावसाचा अलर्ट
मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दक्षिण छत्तीसगडपासून विदर्भ, वरील चक्राकार वारे, कर्नाटक ते दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.

राज्यातील तापमानाची ४३.६ अंश सेल्सिअस नोंद
राज्यातील उच्चांकी ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान ४० अंशांच्या पार असून, तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची वाढ झाल्याने वाशीम, अकोला, धुळे, गडचिरोली, वर्धा येथे तापमान ४२ अंशांच्या वर आहे. मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामानाचा तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.

२२ एप्रिलचे नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये)
पुणे ३७.८, धुळे ४२.०, जळगाव ३९.२, छत्रपती संभाजीनगर ३८.२, परभणी ४०.२, अकोला ४२.२, अमरावती ४१.४, बुलडाणा ३७.६, निफाड ३७.३, सांगली ३८.५, सातारा ३८.७, सोलापूर ३९.२, सांताक्रूझ ३३.८, डहाणू ३४.९, रत्नागिरी ३४.५, ब्रह्मपुरी ४१.८, चंद्रपूर ४१.४, गडचिरोली ४२.०, गोंदिया ३९.८, नागपूर ४०.६, वर्धा ४२.०, वाशीम ४३.६, यवतमाळ ४०.५. कोल्हापूर ३७.०, महाबळेश्वर २९.९, मालेगाव ३९.२, नाशिक ३६.१,

राज्यात ‘अवकाळी’ पावसाचे थैमान?
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल ८५३ गावांना फटका बसला आहे. यामुळे येथील १५ हजार शेतकऱ्यांचे आठ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके बाधीत झाली आहे. शिवाय वीज पडून तब्बल १७ जणांचा मृत्यू आणि ३२ जण जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...