spot_img
ब्रेकिंगकेंद्रीयमंत्री गडकरींचे पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य; नेमकं काय म्हणाले पहा...

केंद्रीयमंत्री गडकरींचे पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य; नेमकं काय म्हणाले पहा…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
भाजपचा विस्तार झपाट्याने होत आहे. पीक वाढले की त्यासोबत रोगही वाढतात. भाजपकडे भरपूर पीक आहेत, जे चांगले उत्पादन देतात, परंतु काही रोग देखील आणतात. त्यामुळे अशा आजारी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करावी लागते, असे बेधडक वक्तव्य पुन्हा एकदा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या 11 दिवस आधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बंडखोरांबाबत वक्तव्य केले आहे. गडकरींना शनिवारी एका मुलाखतीत बंडखोर भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत विचारण्यात आले होते. त्याला उत्तर देताना गडकरी पुढे म्हणाले, भाजपमध्ये नवीन लोक वेगवेगळ्या कारणांसाठी येत आहेत. त्यांना प्रशिक्षण देणे, विचारधारा सांगणे आणि त्यांना कार्यकर्ता बनवणे ही आपली जबाबदारी आहे. हजार कार्यकर्ते उभे असतात, पण कधी कधी एक कार्यकर्ता काहीतरी बोलतो आणि त्या हजार कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरते.

गडकरींना विचारण्यात आले की, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पराभवानंतर नड्डा आणि अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या अनेक बैठका घेतल्या, परंतु ते या बैठकांना उपस्थित नव्हते. त्यावर गडकरी म्हणाले- महाराष्ट्रात माझी कोणतीही भूमिका नाही. येथील नेते सक्षम आहेत. जेव्हा त्यांना माझी गरज असेल तेव्हा मी उपलब्ध असेल.

काँग्रेसने ग्रामीण भारताचा विचार केला नाही
गडकरी पुढे मुलाखतीत म्हणाले की, सरकार आणि प्रशासन धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. एखादी व्यक्ती धर्मनिरपेक्ष असो वा नसो, पण राज्य, सरकार आणि प्रशासन हे धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. काँग्रेसने ग्रामीण भारताच्या विकासाचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही. ग्रामीण भारताला प्राधान्य दिले असते तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या आणि खेड्यात गरिबी नसती. भारताच्या 75 वर्षांच्या इतिहासात काँग्रेसने ग्रामीण भागाच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....