spot_img
ब्रेकिंगकेंद्रीयमंत्री गडकरींचे पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य; नेमकं काय म्हणाले पहा...

केंद्रीयमंत्री गडकरींचे पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य; नेमकं काय म्हणाले पहा…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
भाजपचा विस्तार झपाट्याने होत आहे. पीक वाढले की त्यासोबत रोगही वाढतात. भाजपकडे भरपूर पीक आहेत, जे चांगले उत्पादन देतात, परंतु काही रोग देखील आणतात. त्यामुळे अशा आजारी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करावी लागते, असे बेधडक वक्तव्य पुन्हा एकदा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या 11 दिवस आधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बंडखोरांबाबत वक्तव्य केले आहे. गडकरींना शनिवारी एका मुलाखतीत बंडखोर भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत विचारण्यात आले होते. त्याला उत्तर देताना गडकरी पुढे म्हणाले, भाजपमध्ये नवीन लोक वेगवेगळ्या कारणांसाठी येत आहेत. त्यांना प्रशिक्षण देणे, विचारधारा सांगणे आणि त्यांना कार्यकर्ता बनवणे ही आपली जबाबदारी आहे. हजार कार्यकर्ते उभे असतात, पण कधी कधी एक कार्यकर्ता काहीतरी बोलतो आणि त्या हजार कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरते.

गडकरींना विचारण्यात आले की, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पराभवानंतर नड्डा आणि अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या अनेक बैठका घेतल्या, परंतु ते या बैठकांना उपस्थित नव्हते. त्यावर गडकरी म्हणाले- महाराष्ट्रात माझी कोणतीही भूमिका नाही. येथील नेते सक्षम आहेत. जेव्हा त्यांना माझी गरज असेल तेव्हा मी उपलब्ध असेल.

काँग्रेसने ग्रामीण भारताचा विचार केला नाही
गडकरी पुढे मुलाखतीत म्हणाले की, सरकार आणि प्रशासन धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. एखादी व्यक्ती धर्मनिरपेक्ष असो वा नसो, पण राज्य, सरकार आणि प्रशासन हे धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. काँग्रेसने ग्रामीण भारताच्या विकासाचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही. ग्रामीण भारताला प्राधान्य दिले असते तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या आणि खेड्यात गरिबी नसती. भारताच्या 75 वर्षांच्या इतिहासात काँग्रेसने ग्रामीण भागाच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये गटशिक्षणधिकारी कार्यालयाचे कारनामे उजेडात!

शिक्षकांकडून गंभीर तक्रारी | गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाईसाठी शिक्षक संघटना सरसावल्या अहिल्यानगर । नगर सहयाद्री भ्रष्टाचार, आर्थिक...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : तीन टप्प्यात मतदान, पुढील आठवड्यात घोषणा

दुसर्‍या टप्प्यात झेडपी, पंचायत समिती, महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात मुंबई | नगर सह्याद्री प्रभाग रचना, इतर...

‘तुम्ही डिजिटल अरेस्ट झालात!, सावेडीतील इंजिनीअला ९ लाखाला गंडवले, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर |  नगर सहयाद्री मुंबई सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल करून, ‘अवैध पार्सल’चा बनाव...

हे घ्या पुरावा! राज ठाकरेंनी आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला…, कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीच्या आरोपासंदर्भात निडणूक आयोगाला...