spot_img
अहमदनगरदुर्दैवी : विजेच्या शॉक लागून शेतकर्‍याचा मृत्यू, कुठे घडली घटना पहा

दुर्दैवी : विजेच्या शॉक लागून शेतकर्‍याचा मृत्यू, कुठे घडली घटना पहा

spot_img

बेलवंडीतील घटना | ग्रामस्थांनी केला महाविरणाचा निषेध
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
बेलवंडी शिवारात पडलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर दोन शेळ्यादेखील दगावल्या आहेत. संभाजी किसन वाळके असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बेलवंडी गावातील वाळके वस्तीवरील शेतकरी संभाजी किसन वाळके हे शेळ्या घेऊन नदीच्या कडेला शेळ्यांना चरायला घेऊन गेले होते. नदीच्या कडेला असलेल्या शेतात दोन विद्युत पोल पावसामुळे कोसळले होते. विजेचे पोल पडून सुमारे १८ तास उलटले तरी देखील त्यातील विद्युत पुरवठा सुरूच होता.

शेळ्या चरत असताना विजेच्या तारांजवळ गेल्याने त्यांना विजेचा शॉक लागला. यावेळी संभाजी वाळके हे शेतकरी त्यांच्या जवळ त्यांनादेखील विजेचा शॉक लागला. घटनेची माहिती नातेवाईकांना समजताच त्यांनी तात्काळ जवळच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडित केला. परंतु तोपर्यंत दोन शेळ्या आणि संभाजी वाळके यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर घटनास्थळी बेलवंडी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.

नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शोकाकुल वातावरणात संभाजी वाळके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान शेतकर्‍याच्या मृत्यूस महावितरणच जबाबदार असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी महावितरणचा निषेध व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रति पंढरपूर पळशी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध : सुजित झावरे पाटील

आषाढी एकादशी निमित्त आरती व महापूजा; भाविकांची अलोट गर्दी/ पारनेर पोलीस प्रशासनाचा पळशी येथे...

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...