spot_img
अहमदनगरदुर्दैवी : विजेच्या शॉक लागून शेतकर्‍याचा मृत्यू, कुठे घडली घटना पहा

दुर्दैवी : विजेच्या शॉक लागून शेतकर्‍याचा मृत्यू, कुठे घडली घटना पहा

spot_img

बेलवंडीतील घटना | ग्रामस्थांनी केला महाविरणाचा निषेध
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
बेलवंडी शिवारात पडलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर दोन शेळ्यादेखील दगावल्या आहेत. संभाजी किसन वाळके असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बेलवंडी गावातील वाळके वस्तीवरील शेतकरी संभाजी किसन वाळके हे शेळ्या घेऊन नदीच्या कडेला शेळ्यांना चरायला घेऊन गेले होते. नदीच्या कडेला असलेल्या शेतात दोन विद्युत पोल पावसामुळे कोसळले होते. विजेचे पोल पडून सुमारे १८ तास उलटले तरी देखील त्यातील विद्युत पुरवठा सुरूच होता.

शेळ्या चरत असताना विजेच्या तारांजवळ गेल्याने त्यांना विजेचा शॉक लागला. यावेळी संभाजी वाळके हे शेतकरी त्यांच्या जवळ त्यांनादेखील विजेचा शॉक लागला. घटनेची माहिती नातेवाईकांना समजताच त्यांनी तात्काळ जवळच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडित केला. परंतु तोपर्यंत दोन शेळ्या आणि संभाजी वाळके यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर घटनास्थळी बेलवंडी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.

नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शोकाकुल वातावरणात संभाजी वाळके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान शेतकर्‍याच्या मृत्यूस महावितरणच जबाबदार असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी महावितरणचा निषेध व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...