spot_img
ब्रेकिंगनगर अर्बन घोटाळा प्रकरणी दोन संचालकांना पोलीस कोठडी

नगर अर्बन घोटाळा प्रकरणी दोन संचालकांना पोलीस कोठडी

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : नगर अर्बन घाेटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगात फिरवायला सुरवात केली आहे. पोलिसांनी तत्कालीन संचालक मनेष साठे व अनिल काेठारी यांंना अटक केली होती. या दोघांनाही 2 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

पुढील तपासासाठी पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती मिळाली आहे. नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व १५० कोटींचा घोटाळाबाबत कोतवालीत गुन्हा दाखल आहे. बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी फिर्याद दिली होती.

आर्थिक गुन्हे शाखा याचा तपास करत आहेत. बँकेमधील सर्व कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट झाले असून त्याचा अहवालही मागील महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलेला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने याआधीच दोघांना अटक केली आहेच, ते न्यायालयीन कोठडीत आहेत. आता मनेष साठे व अनिल काेठारी या संचालकांना ताब्यात घेतले होते. त्यांना पोलीस कस्टडी मिळाली आहे. पोलिसांनी आता तत्कालीन संचालकांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली असल्याने इतर संचालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही संचालक परार झाले असून अनेकांचे फोन स्विच ऑफ झाले आहेत अशी चर्चा सध्या कानावर येत आहे.

दरम्यान पोलिसांकडून कारवाई सुरु झाल्याने ठेवीदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता आगामी काळात न्याय मिळेल अशी भावना ठेवीदार व्यक्त करत आहेत. हा तपास आता कोणत्या वळणावर जातो? आणखी कुणी यामध्ये अडकते का? आणखी संचालक अटक होतील का? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘राज्यमंत्री मंडळाची बैठक ‘या’ तारखेला अहिल्यानगरमध्ये भरणार’; जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मांडले जाणार?

जामखेड । नगर सहयाद्री:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मे महिन्याच्या अखेरीस...

पूजा खेडकर प्रकरणात मोठा निर्णय; सुप्रिम कोर्टात काय घडलं?, वाचा एका क्लिकवर..  

IAS Pooja Khedkar News: UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा...

तुमच्या घरावर भानामती? कुटुंबावर संकट! दोन महिलांनी रचला डाव; ३३ लाखाची ‘अशी’ केली फसवणूक

Maharashtra Crime News: आजही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला जात आहे. यातून फसवणूक झाल्याचे देखील समोर...

नागरिकाभिमुख कारभारासाठी महानगरपालिका कटीबद्ध; आयुक्त यशवंत डांगे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेने गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासकीय कामकाजासाठी ई ऑफीस प्रणालीचा वापर सुरू...