spot_img
ब्रेकिंगAhmadnagar Politics: तालुक्यातील गाळ काढण्याची वेळ ! मंत्री विखे पाटील यांनी साधला...

Ahmadnagar Politics: तालुक्यातील गाळ काढण्याची वेळ ! मंत्री विखे पाटील यांनी साधला ‘यांच्या’ वर निशाणा

spot_img

कोपरगाव। नगर सहयाद्री-

आपल्याला कोणत्या दिशेला जायचे आहे ते त्या त्या शहरातील लोकांनी ठरवणे गरजेचे आहे. कोपरगावकरांनी तळ्यातील गाळ काढला आहे. आता कोपरगाव तालुक्यातील गाळ काढण्याची वेळ आलेली असून आता त्याची सुरवातच करण्यात आले असल्याचे म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

कोपरगाव शहरातील रिद्धी सिद्धी नगरमध्ये नागरीकांच्या वतीने सा रे ग म प लिटिल चॅम्प मध्ये महाविजेत्या ठरलेल्या गौरी पगारे हिचा नागरी सत्कार महसूल मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात याप्रसंगी आ.आशुतोष काळे माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे महानंदाचे चेअरमन राजेश परजणे पतसंस्था फेडरेशनचे काका कोयटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले की, आपल्याला कोणत्या दिशेला जायचे आहे ते त्या त्या शहरातील लोकांनी ठरवणे गरजेचे आहे. रोजगारीचा दर मागील 50 वर्षापेक्षा जास्त आहे. जे व्यावसायिक आहेत त्यांनी राजकारणी सोडून विकासाचे मंथन होणे गरजेचे आहे. आपल्या तालुक्यात कोण कुठं चालले आहे याची उत्सुकता जास्त असून ते सोडून शहराच्या सर्वांगीण विकासाची चर्चा होणे गरजेचे आहे.

एमआयडीसी आणण्यात आपण मागे का राहिलो याचे विचारमंथन होणे गरजेचे आहे. मात्र आता आम्ही मंजूर केलेली एमआयडीसी ही राज्यातील अव्वल असेल. तसेच देशात एकच गॅरेंटी आहे. ती म्हणजे पंतप्रदान नरेंद्र मोदी. मात्र येथील काही लोक डळमळीत झाले आहे. ते दुसर्‍याच्या नादी लागलं आहे. चिंता करू नये. आता आपल्या सोबत महायुतीचा आमदार आशुतोष काळे आहेत आणि त्यांना माझी गॅरेंटी असल्याचेही विखे म्हणाले.

मंत्री विखे पाटील यांनी घेतली गौरी पगारेच्या शिक्षणाची जबाबदारी

मंत्री विखे पाटील यांनी गौरी पगारे आणि तिच्या मातोश्री अलका पगारे यांचे अभिनंदन करून वैयक्तिक संवाद साधला आणि पुढे काय करयाचे ठरवले आहे आशी विचारणा केली. तुला आमच्या संस्थेत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली तर येण्याची तयारी आहे का या विखे पाटील यांच्या प्रश्नाला गौरी हिने सकारात्मक प्रतिसाद देवून लगेच होकारही दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाण्याअभावी फळबागा संकटात; श्रीगोंद्यातील शेतकरी हवालदिल

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कुकडीच्या आवर्तनावर मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केली...

प्रतीक्षा संपली बारावीचा निकाल जाहीर; ‘असा’ पहा निकाल..

HSC Result 2025: महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल...

संगमनेरच्या संरक्षणाचे कवच जनतेने घालविले! आता..; माजी मंत्री थोरात कुणावर बरसले, वाचा सविस्तर

संगमनेर । नगर सहयाद्री एकही दिवस विश्रांती न घेता सातत्याने चाळीस वर्ष काम केले....

सावेडीत धक्कादायक प्रकार! घाबरलेल्या महिलेचा ११२ वर कॉल..; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- सावेडी परिसरातील पाईपलाईन रोड येथे 2 मे रोजी रात्री 11...