spot_img
ब्रेकिंगAhmadnagar Politics: तालुक्यातील गाळ काढण्याची वेळ ! मंत्री विखे पाटील यांनी साधला...

Ahmadnagar Politics: तालुक्यातील गाळ काढण्याची वेळ ! मंत्री विखे पाटील यांनी साधला ‘यांच्या’ वर निशाणा

spot_img

कोपरगाव। नगर सहयाद्री-

आपल्याला कोणत्या दिशेला जायचे आहे ते त्या त्या शहरातील लोकांनी ठरवणे गरजेचे आहे. कोपरगावकरांनी तळ्यातील गाळ काढला आहे. आता कोपरगाव तालुक्यातील गाळ काढण्याची वेळ आलेली असून आता त्याची सुरवातच करण्यात आले असल्याचे म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

कोपरगाव शहरातील रिद्धी सिद्धी नगरमध्ये नागरीकांच्या वतीने सा रे ग म प लिटिल चॅम्प मध्ये महाविजेत्या ठरलेल्या गौरी पगारे हिचा नागरी सत्कार महसूल मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात याप्रसंगी आ.आशुतोष काळे माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे महानंदाचे चेअरमन राजेश परजणे पतसंस्था फेडरेशनचे काका कोयटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले की, आपल्याला कोणत्या दिशेला जायचे आहे ते त्या त्या शहरातील लोकांनी ठरवणे गरजेचे आहे. रोजगारीचा दर मागील 50 वर्षापेक्षा जास्त आहे. जे व्यावसायिक आहेत त्यांनी राजकारणी सोडून विकासाचे मंथन होणे गरजेचे आहे. आपल्या तालुक्यात कोण कुठं चालले आहे याची उत्सुकता जास्त असून ते सोडून शहराच्या सर्वांगीण विकासाची चर्चा होणे गरजेचे आहे.

एमआयडीसी आणण्यात आपण मागे का राहिलो याचे विचारमंथन होणे गरजेचे आहे. मात्र आता आम्ही मंजूर केलेली एमआयडीसी ही राज्यातील अव्वल असेल. तसेच देशात एकच गॅरेंटी आहे. ती म्हणजे पंतप्रदान नरेंद्र मोदी. मात्र येथील काही लोक डळमळीत झाले आहे. ते दुसर्‍याच्या नादी लागलं आहे. चिंता करू नये. आता आपल्या सोबत महायुतीचा आमदार आशुतोष काळे आहेत आणि त्यांना माझी गॅरेंटी असल्याचेही विखे म्हणाले.

मंत्री विखे पाटील यांनी घेतली गौरी पगारेच्या शिक्षणाची जबाबदारी

मंत्री विखे पाटील यांनी गौरी पगारे आणि तिच्या मातोश्री अलका पगारे यांचे अभिनंदन करून वैयक्तिक संवाद साधला आणि पुढे काय करयाचे ठरवले आहे आशी विचारणा केली. तुला आमच्या संस्थेत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली तर येण्याची तयारी आहे का या विखे पाटील यांच्या प्रश्नाला गौरी हिने सकारात्मक प्रतिसाद देवून लगेच होकारही दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

दाखवायचं कोणाला आणि झाकायचं कोणाचं ? एक कुटुंब महिन्याला कर्मचार्‍यांचे पगार तर दुसरे कुटुंब...

Accident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली घटना?

Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्‍या आयशरचा भीषण...

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...