spot_img
अहमदनगरAhmednagar : 'मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ'

Ahmednagar : ‘मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ’

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री
पाणीदार तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीगोंदा तालुक्यातील पाणी व ओढे, नाले, कॅनल आटल्याने मेंढपाळांनी आपला मुक्काम हलविलेला आहे. पावसाने दडी मारल्याने पिण्याचे पाणी आणि चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मेंढपाळ आपले मेंढ्या त्यांचे कोकरे, कुटुंबाचे सदस्यांचे जेवणाचे साहित्य, पाळीव कुत्रे, कोंबड्या, त्यांची लहान मुलं घोड्यांच्या पाठीवर बसून चारा आणि पाण्याच्या शोधात भटकंती करत फिरत असल्याची स्थिती आहे.

पावसाळा संपताच घरातील वयोवृद्ध व्यक्तींचे जेवण पाण्याची सोय करून मेंढपाळ कुटुंब मेंढ्यांच्या चारा आणि पाण्याच्या शोधात शेकडो मैल पायपीट करत जातात. परंतु यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने हजारो मैल भटकंतीवर गेलेल्या मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घराचा रस्ता विसरण्याची वेळ आली आहे. कारण मेंढ्या जगविण्यासाठी ज्या भागात पाऊस पडला आहे. त्या भागात या मेंढपाळांना चार्‍याच्या शोधात निघावे लागले आहे.

दरम्यान सध्याला घराजवळ येऊन पुन्हा घराच्यांना विसरून चारा पाण्याच्या शोधात जावे लागत असल्याने घरातील वयोवृद्ध व्यक्तींना गहिवरून आले असल्याचे चित्र पाहायला मिळते. परंतु कुटुंबीयांपेक्षा मुक्या प्राण्यांचा जीव महत्त्वाचा माणूस घोड्याच्या पाठीवर संसार उपयोगी साहित्य लादुन ते शेकडो मैलाच्या प्रवासासाठी निघाले आहेत.

यावर्षीचे सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा न करता राणावाणांमध्ये साजरा करण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे. चालू वर्षी सुरुवातीलाच पावसाळ्यात पहिल्यापासूनच पावसाने दडी मारल्याने पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चार्‍यांचा प्रश्न गंभीर झाला. तसेच मेंढ्यांच्या चार्‍यासाठी व पाण्यासाठी भटकंती करत असताना मेंढपाळांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. मेंढपाळ सध्या घराचा रस्ता धरत असतानाच गावाकडेही चार्‍याचा प्रश्न गंभीर बनल्याने ज्या भागात पाणी व चारा उपलब्ध आहे. त्या भागाकडे मेंढपाळ कुटुंबीयांनी आपला मोर्चा वळविला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ
पावसाने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने हजारो मैल भटकंतीवर गेलेल्या मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ आली आहे, कारण मेंढ्या जगविण्यासाठी ज्या भागात चारा व पाणी उपलब्ध आहे. त्या भागात या मेंढपाळांना चार्‍याच्या शोधात निघावे लागत आहे. पाळीव जनावरांनाही सध्या पाणी व चारा टंचाई भासत आहे. आम्ही दरवर्षी श्रीगोंदा तालुक्यामध्ये चारणीसाठी येत असतो परंतु यावर्षी पावसाने दडी मारल्याने परिसरात पाणी नसल्याने आम्ही आमचा मुक्काम दुसर्‍या ठिकाणी हलवला आहे.
– धोंडीबा सरक (मेंढपाळ)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिका वॉर्ड रचनेची प्रतीक्षा संपली; तीन वॉर्डात काय आणि कसे झाले बदल पहा

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या...

भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन

अहिल्‍यानगर / नगर सह्याद्री - भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय...

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...