spot_img
अहमदनगरAhmednagar : 'मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ'

Ahmednagar : ‘मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ’

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री
पाणीदार तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीगोंदा तालुक्यातील पाणी व ओढे, नाले, कॅनल आटल्याने मेंढपाळांनी आपला मुक्काम हलविलेला आहे. पावसाने दडी मारल्याने पिण्याचे पाणी आणि चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मेंढपाळ आपले मेंढ्या त्यांचे कोकरे, कुटुंबाचे सदस्यांचे जेवणाचे साहित्य, पाळीव कुत्रे, कोंबड्या, त्यांची लहान मुलं घोड्यांच्या पाठीवर बसून चारा आणि पाण्याच्या शोधात भटकंती करत फिरत असल्याची स्थिती आहे.

पावसाळा संपताच घरातील वयोवृद्ध व्यक्तींचे जेवण पाण्याची सोय करून मेंढपाळ कुटुंब मेंढ्यांच्या चारा आणि पाण्याच्या शोधात शेकडो मैल पायपीट करत जातात. परंतु यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने हजारो मैल भटकंतीवर गेलेल्या मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घराचा रस्ता विसरण्याची वेळ आली आहे. कारण मेंढ्या जगविण्यासाठी ज्या भागात पाऊस पडला आहे. त्या भागात या मेंढपाळांना चार्‍याच्या शोधात निघावे लागले आहे.

दरम्यान सध्याला घराजवळ येऊन पुन्हा घराच्यांना विसरून चारा पाण्याच्या शोधात जावे लागत असल्याने घरातील वयोवृद्ध व्यक्तींना गहिवरून आले असल्याचे चित्र पाहायला मिळते. परंतु कुटुंबीयांपेक्षा मुक्या प्राण्यांचा जीव महत्त्वाचा माणूस घोड्याच्या पाठीवर संसार उपयोगी साहित्य लादुन ते शेकडो मैलाच्या प्रवासासाठी निघाले आहेत.

यावर्षीचे सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा न करता राणावाणांमध्ये साजरा करण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे. चालू वर्षी सुरुवातीलाच पावसाळ्यात पहिल्यापासूनच पावसाने दडी मारल्याने पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चार्‍यांचा प्रश्न गंभीर झाला. तसेच मेंढ्यांच्या चार्‍यासाठी व पाण्यासाठी भटकंती करत असताना मेंढपाळांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. मेंढपाळ सध्या घराचा रस्ता धरत असतानाच गावाकडेही चार्‍याचा प्रश्न गंभीर बनल्याने ज्या भागात पाणी व चारा उपलब्ध आहे. त्या भागाकडे मेंढपाळ कुटुंबीयांनी आपला मोर्चा वळविला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ
पावसाने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने हजारो मैल भटकंतीवर गेलेल्या मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ आली आहे, कारण मेंढ्या जगविण्यासाठी ज्या भागात चारा व पाणी उपलब्ध आहे. त्या भागात या मेंढपाळांना चार्‍याच्या शोधात निघावे लागत आहे. पाळीव जनावरांनाही सध्या पाणी व चारा टंचाई भासत आहे. आम्ही दरवर्षी श्रीगोंदा तालुक्यामध्ये चारणीसाठी येत असतो परंतु यावर्षी पावसाने दडी मारल्याने परिसरात पाणी नसल्याने आम्ही आमचा मुक्काम दुसर्‍या ठिकाणी हलवला आहे.
– धोंडीबा सरक (मेंढपाळ)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...

झेडपीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच!

नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे...