spot_img
अहमदनगरAhmednagar : 'मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ'

Ahmednagar : ‘मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ’

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री
पाणीदार तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीगोंदा तालुक्यातील पाणी व ओढे, नाले, कॅनल आटल्याने मेंढपाळांनी आपला मुक्काम हलविलेला आहे. पावसाने दडी मारल्याने पिण्याचे पाणी आणि चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मेंढपाळ आपले मेंढ्या त्यांचे कोकरे, कुटुंबाचे सदस्यांचे जेवणाचे साहित्य, पाळीव कुत्रे, कोंबड्या, त्यांची लहान मुलं घोड्यांच्या पाठीवर बसून चारा आणि पाण्याच्या शोधात भटकंती करत फिरत असल्याची स्थिती आहे.

पावसाळा संपताच घरातील वयोवृद्ध व्यक्तींचे जेवण पाण्याची सोय करून मेंढपाळ कुटुंब मेंढ्यांच्या चारा आणि पाण्याच्या शोधात शेकडो मैल पायपीट करत जातात. परंतु यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने हजारो मैल भटकंतीवर गेलेल्या मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घराचा रस्ता विसरण्याची वेळ आली आहे. कारण मेंढ्या जगविण्यासाठी ज्या भागात पाऊस पडला आहे. त्या भागात या मेंढपाळांना चार्‍याच्या शोधात निघावे लागले आहे.

दरम्यान सध्याला घराजवळ येऊन पुन्हा घराच्यांना विसरून चारा पाण्याच्या शोधात जावे लागत असल्याने घरातील वयोवृद्ध व्यक्तींना गहिवरून आले असल्याचे चित्र पाहायला मिळते. परंतु कुटुंबीयांपेक्षा मुक्या प्राण्यांचा जीव महत्त्वाचा माणूस घोड्याच्या पाठीवर संसार उपयोगी साहित्य लादुन ते शेकडो मैलाच्या प्रवासासाठी निघाले आहेत.

यावर्षीचे सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा न करता राणावाणांमध्ये साजरा करण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे. चालू वर्षी सुरुवातीलाच पावसाळ्यात पहिल्यापासूनच पावसाने दडी मारल्याने पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चार्‍यांचा प्रश्न गंभीर झाला. तसेच मेंढ्यांच्या चार्‍यासाठी व पाण्यासाठी भटकंती करत असताना मेंढपाळांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. मेंढपाळ सध्या घराचा रस्ता धरत असतानाच गावाकडेही चार्‍याचा प्रश्न गंभीर बनल्याने ज्या भागात पाणी व चारा उपलब्ध आहे. त्या भागाकडे मेंढपाळ कुटुंबीयांनी आपला मोर्चा वळविला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ
पावसाने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने हजारो मैल भटकंतीवर गेलेल्या मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ आली आहे, कारण मेंढ्या जगविण्यासाठी ज्या भागात चारा व पाणी उपलब्ध आहे. त्या भागात या मेंढपाळांना चार्‍याच्या शोधात निघावे लागत आहे. पाळीव जनावरांनाही सध्या पाणी व चारा टंचाई भासत आहे. आम्ही दरवर्षी श्रीगोंदा तालुक्यामध्ये चारणीसाठी येत असतो परंतु यावर्षी पावसाने दडी मारल्याने परिसरात पाणी नसल्याने आम्ही आमचा मुक्काम दुसर्‍या ठिकाणी हलवला आहे.
– धोंडीबा सरक (मेंढपाळ)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...

गाडिलकर कुटुंबियांकडून शेकडो ठेवीदारांना गंडा?; सिस्पेविरोधात अन्नत्याग आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील वाघुंडे येथील विनोद गाडिलकर व विक्रम गाडिलकर कुटुंबीयांनी दामदुप्पट सह...