spot_img
अहमदनगर'जे चुकीचे वागले त्यांना शिक्षा झाली पाहिजे', आ. थोरात यांनी घेतली खा.लंके...

‘जे चुकीचे वागले त्यांना शिक्षा झाली पाहिजे’, आ. थोरात यांनी घेतली खा.लंके यांची भेट

spot_img

माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात | सलाईन घेत खा.लंके यांचे उपोषण सुरू

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
त्रास होईल म्हणून लोक बोलत नाही. आता लोक बोलत आहे. जे चुकीचे वागले आहे. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी अपेक्षा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.खासदार नीलेश लंके यांनी अहमदनगर पोलिस प्रशासनातील स्थानिक गुन्हे शाखेतील भष्ट्रचाराविरोधात उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली. योवळी खा.लंके यांची भेट घेत दोषींवर कारवाईची मागणी केली.

दरम्यान खा.लंके यांना अशक्तपणा जाणावत असल्याने उपोषण स्थळी थेट सलाईन लावण्यात आले आहे. जो दोषींवर कारवाई होत नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची आक्रमक भूमिका खा.लंके यांनी घेतली आहे. दरम्यान बुधवारी रात्री आ.प्राजक्त तनपुरे यांनी खा.लंके यांची भेट घेतली. यावेळी उपस्थित प्रसारमाध्यमांशी संवाद साधत लंके यांनी पोलिसांचे रेट कार्ड जाहीर केले.

यावेळी बोलतांना थोरात म्हणाले की, लोकांच्या प्रश्नाला खासदार लंके यांनी हात घातला आहे. लोकांना अनेक वेळा त्रास होतो. म्हणून बोलत नाही. कारण अजून त्रास होईल या भिंतीने. जे चुकींचे वागले त्यांना शिक्षा झाली पाहिजे. याबाबत मी नाशिकचे आयजी यांंच्या सोबत चर्चा केली. त्यांना सर्व परिस्थिती ही सांंगितली आहे. याबाबत मला चर्चा करण्याची गरज वाटते. त्यामुळे याप्रकरावर निर्णय होणे अपेक्षित आहे. तसेच आयजी हे पोलिस प्रशसनातील एक प्रमुख अधिकारी आहे. वास्तविक पाहता त्यांनी देखील याप्रकारांकडे लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संग्राम जगताप यांची प्रखर हिंदुत्वाची भूमिका का?, वाचा इनसाईड स्टोरी..

इनसाईड स्टोरी : स्व. अरुणकाकांसह संग्राम जगताप यांच्या राजकीय वाटचालीत मुस्लिम मतपेढी कधी निर्णायक...

मोठी बातमी! शरद पवारांची राज-उद्धव ठाकरेंना साथ, रोखठोक बोलले..

मुंबई । नगर सहयाद्री राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीतूनच त्रिभाषा सूत्र राबवण्याच्या निर्णयावरुन राज्यातील राजकारण चांगलेच...

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ‘या’ मुद्द्यावरून तापणार, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री राज्य विधिमंडळाचे यंदाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या...

राज्यात पावसाची रिपरिप वाढणार का?; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात येत्या पाच दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान...