spot_img
ब्रेकिंग..त्यांना अधिकार नाहीच! खासदर राऊत म्हणाले, लोकसभेच्या 'इतक्या' जागा लढविणार

..त्यांना अधिकार नाहीच! खासदर राऊत म्हणाले, लोकसभेच्या ‘इतक्या’ जागा लढविणार

spot_img

लोकसभेच्या २३ जागा लढविणार, चर्चा दिल्लीतच करणार

नवी दिल्ली | नगर सह्याद्री

आगामी लोकसभा निवडणुकीत ‘उबाठा’ २३ जागा लढवेल. आम्ही याबाबत दिल्लीतील काँग्रेस हायकमांडला कल्पना दिली आहे, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना निर्णयाचे काहीच अधिकार नसल्याने जागावाटपाची चर्चा दिल्लीत झालेलीच बरी, अशीही टिपणी त्यांनी केली.

पत्रकार परिषदेत खा. राऊत म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या हवाल्याने काँग्रेस पक्ष लोकसभेला २५ जागा लढवेल, असे सांगितले जात आहे. ही बातमी कोणी दिली, मला माहिती नाही. काँग्रेस पक्षाने खुशाल महाराष्ट्रात सर्व ४८ जागांवर निवडणूक लढवावी. पण काल आम्ही दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत बसलो होतो. हे बहुतेक महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना माहिती नसेल. तेव्हा आमच्यात काय चर्चा झाली, हे आम्हालाच माहिती आहे. उद्धव ठाकरे दिल्लीत आले होते. त्यावेळी ते, आदित्य ठाकरे आणि मी यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल यांच्याशी तब्बल अर्धा तास महाराष्ट्राबाबत चर्चा केली. बैठकीत काय घडलं, हे आम्हालाच माहिती आहे.

खा. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात कोणताही एक नेता नाही, असला तरी त्याला निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. निर्णय घेण्यासाठी त्याला दिल्लीत विचारावे लागते. त्यामुळे महाराष्ट्रातील जागावाटपाची चर्चा दिल्लीत हायकमांडसमोर होईल. आम्ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींना स्पष्ट सांगितले आहे की, शिवसेना लोकसभेच्या २३ जागा लढवेल. हा शिवसेनेचा गेल्या कित्येक वर्षांपासूनचा आकडा आहे.

सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि वेणुगोपाल या दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी आमचे मधूर संबंध आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. ते महाविकास आघाडीचे घटक असावेत, असे आम्हाला वाटते. त्याबाबतही दिल्लीत चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नसल्यामुळे जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा केलेलीच बरी ठरेल. जागावाटप जवळपास ठरलेले आहे. अंतिम जागावाटप
आम्ही दोन तासांत पूर्ण करु.

तो निर्णय हायकमांडच घेणार: वडेट्टीवार
संजय राऊत यांनी लोकसभेच्या जागावाटपावर भाष्य करताच काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. कोण किती जागा लढणार, हा वादाचा विषय होऊ शकत नाही. ज्याची जिथे ताकद आहे, तो पक्ष ती जागा लढवेल. हा निर्णय हायकमांडच घेणार आहे. जागावाटपासाठी अद्याप प्राथमिक चर्चेची फेरीही झालेली नाही. त्यामुळे संख्येचा प्रश्न आला कुठे? काहीतरी वावड्या उठवून आपसांत भांडण लावायचा हा विरोधकांचा प्रयत्न आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम; मोठ्या पवारांनी विषय संपवला, रोहित पवार म्हणाले…

पुणे / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन...

अखेर भाजपने घेतला निर्णय; शहर जिल्हाध्यक्षपदावर कोणाची वर्णी…पहा

अहिल्यानगर शहर भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भाजपच्या अहिल्यानगर शहर...

महानगर बँकेसाठी रविवारी मतदान; कुणाच्या बाजूने झुकली निवडणूक?

गीतांजली शेळके यांच्या बाजूने झुकली निवडणूक | कपबशीसाठी सर्व जागांचा कल मुंबई | नगर...

तुरुंगात जाण्याआधी बाजीरावकडून गोरेश्वर मल्टीस्टेटचा विक्री महोत्सव!

तुरुंगात राहून गोरेश्वर पतसंस्था पुन्हा ताब्यात देण्याचे करतोय आर्जव पारनेर | नगर सह्याद्री आर्थिक घोटाळे घालत...