spot_img
राजकारण'मी सर्व भाषणे मागे घेतो..सरकारच मनोज जरांगेंना वेठीस धरतंय', छगन भुजबळांच्या वक्तव्याने...

‘मी सर्व भाषणे मागे घेतो..सरकारच मनोज जरांगेंना वेठीस धरतंय’, छगन भुजबळांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण वरून वातावरण चांगलेच गरम झाले आहे. यावरून ओबीसी व मराठा समाज यांतील वातावरणही वातावरण गरमागरम झाले आहे. आरक्षणाबाबत राज्य सरकारला दिलेली २४ डिसेंबर डेडलाइन जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या शिष्टमंडळाने काल जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी जात भेट घेतली. या दरम्यान सरकारने आधी लिहून दिल्याप्रमाणे

एखाद्याची नोंद आढळल्यानंतर सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी जरांगेंकडून करण्यात आली. सरकारकडून जरांगे पाटलांच्या मागण्यांना विशेष महत्त्व दिलं जात असल्याच्या मुद्द्यावरून आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर उपरोधिक शैलीत जोरदार हल्ला चढवला आहे.

काय म्हणाले भुजबळ
“सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या पाहिजेत. एखाद्या महिलेची कुणबी नोंद आढळल्यानंतर तिच्या आई-वडिलांना, सासू-सासऱ्यांना सगळ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवं. एवढंच कशाला, मंत्र्यांचे दोन-तीन बंगलेही जरांगेंच्या उपोषणस्थळीच बांधायला हवे.

तसंच मुख्य सचिवांचाही बंगला तिकडेच बांधायला हवा. म्हणजे जरांगेंनी एखादी मागणी केली की लगेच त्याचा जीआर सरकारला काढता येईल. बंगलेच तिकडे बांधल्याने जाण्या-येण्याचा वेळही वाचेल,” असं म्हणत छगन भुजबळ यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. छगन भुजबळ यांनी आज जरांगे यांच्याविरोधात न बोलता उपरोधिक शैलीत सरकारलाच लक्ष्य केलं.

पत्रकार परिषदेत भुजबळ यांना विचारले की, मनोज जरांगेंकडून सरकारला वेठीस धरलं जात आहे का?यावर भुजबळ म्हणाले की, “मनोज जरांगे हे अजिबात सरकारला वेठीस धरत नाही. उलट सरकारच वेळकाढूपणा करत आहे. जरांगेंच्या मागण्या ताबोडतोब मान्य करायला हव्यात, मी आतापर्यंत केलेली सर्व भाषणे मागे घेतो, सर्व वक्तव्यं मागे घेतो, असा उपरोधिक टोला लगावला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! प्रियकराच्या घराबाहेर तृतीयपंथीयाची आत्महत्या

पुणे । नगर सहयाद्री:- पुण्यातील तृतीयपंथीयाला जयपूरचा तरूण आवडला. दोघांमधले प्रेम बहरले. ते दोघेही...

नैतिकता : धनुभाऊंना नाहीच; अजितदादा तुम्हाला? धनंजय मुंडेंना किती दिवस पोसणार?, चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!

खंडणीखोर मुकादम, बेभान कार्यकर्ते, सत्तेचा माज असणारे नेते अन्‌‍ टुकार चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!सारिपाट...

ट्रक दरीत कोसळून 10 जण ठार; कुठे घडला भयंकर अपघात!

नवी दिल्ली | नगर सह्याद्री:- कर्नाटकमध्ये बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक...

महाराष्ट्राच्या हाती मोठं घबाड! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात काय-काय घडलं?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी; सव्वासहा लाख कोटींवर गुंतवणूक करार मुंबई | नगर...