spot_img
अहमदनगरआता माघार नाही ; महापालिका संघटनेचे आझाद मैदानावर धरणे, अध्यक्ष म्हणाले...

आता माघार नाही ; महापालिका संघटनेचे आझाद मैदानावर धरणे, अध्यक्ष म्हणाले…

spot_img

जोपर्यंत कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत माघार नाही – अध्यक्ष आनंद लोखंडे
अहमदनगर / नगर सह्याद्री –
अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित असून राज्य शासनाकडे सातवा वेतन आयोग व लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क नोकरी मिळावी यासाठी अहमदनगर मनपा कर्मचारी संघटनेच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे

अहमदनगर मनपा कर्मचारी संघटनेच्या वतीने याआधी २ ऑक्टोबर रोजी नगर ते मुंबई मंत्रालय असा लॉंग मार्च सुरु देखील करण्यात आला होता. दरम्यान सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर या लॉंग मार्चला स्थगिती देण्यात आली होती.

मात्र त्यानंतर आजतागायत सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने अहमदनगर मनपा कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी पुन्हा पाठपुरावा करत मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले असून जोपर्यंत कर्मचाऱ्यांचे दोन्ही प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आमची माघार घेणार नाही असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंद लोखंडे, सरचिटणीस आनंदराव वायकर, उपाध्यक्ष बाबासाहेब मुदगल, बलराज गायकवाड, विठठल उमाप, महादेव कोतकर, बाबासाहेब राशिनकर, राजु पठारे, अजय सौदे, आदी मनपा कर्मचारी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...