spot_img
अहमदनगरआता माघार नाही ; महापालिका संघटनेचे आझाद मैदानावर धरणे, अध्यक्ष म्हणाले...

आता माघार नाही ; महापालिका संघटनेचे आझाद मैदानावर धरणे, अध्यक्ष म्हणाले…

spot_img

जोपर्यंत कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत माघार नाही – अध्यक्ष आनंद लोखंडे
अहमदनगर / नगर सह्याद्री –
अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित असून राज्य शासनाकडे सातवा वेतन आयोग व लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क नोकरी मिळावी यासाठी अहमदनगर मनपा कर्मचारी संघटनेच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे

अहमदनगर मनपा कर्मचारी संघटनेच्या वतीने याआधी २ ऑक्टोबर रोजी नगर ते मुंबई मंत्रालय असा लॉंग मार्च सुरु देखील करण्यात आला होता. दरम्यान सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर या लॉंग मार्चला स्थगिती देण्यात आली होती.

मात्र त्यानंतर आजतागायत सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने अहमदनगर मनपा कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी पुन्हा पाठपुरावा करत मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले असून जोपर्यंत कर्मचाऱ्यांचे दोन्ही प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आमची माघार घेणार नाही असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंद लोखंडे, सरचिटणीस आनंदराव वायकर, उपाध्यक्ष बाबासाहेब मुदगल, बलराज गायकवाड, विठठल उमाप, महादेव कोतकर, बाबासाहेब राशिनकर, राजु पठारे, अजय सौदे, आदी मनपा कर्मचारी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एमआयडीसीत युवकावर कोयत्याने हल्ला; असा घडला प्रकार

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळ जवळ, माताजीनगर येथे एका युवकावर जुन्या...

पारनेरला पावसाने झोडपले; कुठे कुठे झाला पाऊस, पहा

कान्हूर पठार, तिखोल, टाकळी ढोकेश्वर भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकर्‍यांमध्ये उत्साह पारनेर | नगर सह्याद्री पारनेर...

पावसाळा! महापालिका अलर्ट, असे केले नियोजन…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून चारही प्रभाग समिती कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन...

आता जिल्ह्यातील १५७५ गावांत मिळणार शुद्ध पाणी; कसे ते पहा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची रासायनिक व जैविक गुणवत्ता तपासण्यासाठी ७ जून...