spot_img
ब्रेकिंग'त्यांची' नियत चुकीची! राहुल गांधींचं कोल्हापुरात धडाकेबाज भाषण; भाजपावर घणाघात, नेमकं काय...

‘त्यांची’ नियत चुकीची! राहुल गांधींचं कोल्हापुरात धडाकेबाज भाषण; भाजपावर घणाघात, नेमकं काय म्हणाले? वाचा..

spot_img

Politics News: सर्वांना सोबत घेऊन जायचंय, अन्याय करायचा नाही हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी देश आणि जगाला दिला. शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं आज कोणतं प्रतिक असेल तर ते संविधान आहे. असं सांगत काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपावर घणाघात केला. काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापूरच्या कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, आम्ही पुतळ्याचं अनावरण केले, परंतु छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण आयुष्यभर ज्यासाठी लढले, त्यासाठी आम्ही लढलो नाही तर पुतळ्याला काही अर्थ नाही. जेव्हा आपण छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करतो तेव्हा एक वचनही घेतो, ज्याच्यासाठी ते लढले, त्यांच्या इतके नाही परंतु थोडं आपल्यालाही करायला हवं. जर शिवाजी महाराजांसारखे, शाहू महाराजांसारखे व्यक्ती नसते तर आज संविधान नसते. याचा अर्थ शिवाजी महाराजांची विचारधारा आणि संविधान यांचे थेट कनेक्शन आहे असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, नियत कधी लपवू शकत नाही, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला पण काही महिन्यांनी तो कोसळला. त्यांची नियत चुकीची होती. पुतळ्याने ते संकेत दिले. जर तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत असाल तर तुम्हाला त्यांच्या विचारधारेचं रक्षण करावे लागेल. त्यामुळे तो पुतळा पडला. कारण त्या लोकांची विचारधारा चुकीची आहे. ते शिवाजी महाराजांसमोर हात जोडतात आणि २४ तास शिवाजी महाराजांच्या विचारांविरोधात काम करतात. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ दिला नाही. राम मंदिराच्या उद्घाटनात, संसदेच्या उद्घाटनात आदिवासी राष्ट्रपतींना जावू दिले नाही.या विचारधारा एकच आहे, विचारधारेत फरक नाही. ही राजकीय लढाई नसून विचारधारेची लढाई आहे. संविधानाची आणि घटनेची लढाई आहे. अशी टीकाही राहुल गांधी यांनी भाजपावर केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे वक्तव्य

पारनेर । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करत खासदार नीलेश...

शेवगाव, पाथर्डीतील मावा विक्रेत्यांवर छापे; ४ आरोपींना अटक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व...

२६ गोवंशीय जनावरांची सुटका; पोलिसांनी ‘असा’ लावला सापळा, ३ आरोपींसह मुद्देमाल ताब्यात

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांची...