spot_img
अहमदनगरइंजिनिअरिंगच्या तरुणीसोबत घडलं ते 'भयंकर'! पुण्यातून अपहरण केलं नंतर नगरमध्ये आणलं पुढे..

इंजिनिअरिंगच्या तरुणीसोबत घडलं ते ‘भयंकर’! पुण्यातून अपहरण केलं नंतर नगरमध्ये आणलं पुढे..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
पुणे येथून बेपत्ता झालेल्या एका इंजिनिअरिंगच्या तरुणीची नगरमध्ये हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महाविद्यालयीन मित्रासह तीन जणांनी खंडणीसाठी तिचे अपहरण करून तिचा गळा दाबून तिला मारून टाकल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.  याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. भाग्यश्री सुडे (वय – 22, मु. रा. हरंगुळ, लातूर) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.

वाघोली परिसरातील एका महाविद्यालयात सदर तरुणी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेते होती. महाविद्यालयीन मित्र आणि इतर दोघांनी तिला 30 मार्च रोजी अहमदनगरमध्ये आणले होते. त्यांनंतर त्या तीन मुलांनी मुलीच्या कटुबियांकडे नऊ लाख रुपयांची खंडणीची मागणी करत भाग्यश्री हिच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सांगितले होते.

त्यानंतर त्याचदिवशी गाडीत तिचा गळा दाबून निघृण खुन केला. त्यानंतर मृतदेह सुपा गावाजवळ एका मोकळ्या जागेत पुरला. त्यानंतर तिच्या मोबाईलचे सिमकार्ड काढून घेतले. दरम्यान जेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधला परंतु संपर्क होऊ न शकल्याने त्यांनी महाविद्यालयाकडे धाव घेतली. परंतु त्यांना तिथेही ती सापडली नाही, तेव्हा त्यांनी पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी घटनेची गांभीर्यानी दखल घेत तांत्रिक विश्लेषणाद्वारे तीन आरोपींवर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तीन आरोपीना बेड्या ठोकल्या. अधिक तपास करत असतांना पोलिसांनी खाक्या दाखवताच गुन्ह्याबद्दल कबुली दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...