spot_img
अहमदनगरAhmednagar politics: लोकनियुक्त मंडळाची मुदत संपणार! पदभार कोणाकडे? महापालिकेवर..

Ahmednagar politics: लोकनियुक्त मंडळाची मुदत संपणार! पदभार कोणाकडे? महापालिकेवर..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
महापालिकेवर प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मनपा प्रशासनाकडून नगरविकास खात्याला लोकनियुक्त मंडळाची मुदत ३१ डिसेंबरला संपत असून, पुढील प्रक्रिया करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचीच नियुक्ती होणार की जिल्हाधिकार्‍यांकडे प्रशासकीय पदभार देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महापालिकेच्या लोकनियुक्त मंडळाची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. नागरिकांचा मागस वर्ग आरक्षण संदर्भात न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. बहुतांश जिल्हा परिषद, महापालिकांमध्ये प्रशासकीय राज सुरू आहे. या निवडणुका कधी होतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे ३१ डिसेंबरनंतर येथील महापालिकेवर प्रशासक येणार, हे निश्चित आहे. त्या प्रक्रियेची तयारी म्हणून महापालिका प्रशासनाने नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना पत्र दिले आहे.

त्यात ३१ डिसेंबरला मुदत संपत असून, पुढील कार्यवाहीसंदर्भात प्रक्रिया करण्याची विनंती करण्यात आली आहे.
आतापर्यंत जेथे प्रशासक आहे, तेथे तेथील प्रमुख अधिकार्‍याकडेच पदभार सोपविण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचा प्रशासक पदाचा भार मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिकेतील प्रशासक पदाचा कार्यभार आयुक्तांकडे सोपविण्यात आलेला आहे.

मात्र येथे नुकत्याच एका कार्यक्रमात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आपल्याकडे महापालिकेच्या प्रशासक पदाचा कार्यभार आल्यास काही गोष्टी मार्गी लावता येतील, असे जाहीर वक्तव्य केले होते. त्यामुळे तेंव्हापासून नेमका प्रशासक कोण असेल, याकडेही शहराचे लक्ष लागले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...