spot_img
ब्रेकिंगसूर्य आग ओकणार! हवामान विभागाने वर्तवला 'असा' अंदाज

सूर्य आग ओकणार! हवामान विभागाने वर्तवला ‘असा’ अंदाज

spot_img

Maharashtra Weather Update :महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये एप्रिल ते जून महिन्यात भीषण उकाडा जाणवू शकतो, अशी शयता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात तर याच महिन्यापासून लोकांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. भारतीय हवामान विभागानुसार, महाराष्ट्रात एप्रिल ते मे महिन्यादरम्यान अधिक उकाडा जाणवेल. राज्यात जवळपास २० दिवस हीट वेव असेल अशीही शयता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान हवामान कोरडं पडेल आणि उष्णता इतकी वाढेल की घराबाहेर पडणंही कठीण होईल.

हवामान विभागाने सोमवारी १ एप्रिलला सांगितलं की एप्रिल ते जून यादरम्यान नागरिकांना तीव्र उकाडा सोसावा लागेल. हवामान विभागाचे महानिदेशक मृत्यूंजय महापात्र यांनी सांगितलं की एप्रिल ते जून या कालावधीत महाराष्ट्रासह देशातील बर्‍याच भागात उष्णतेच्या झळा बसणार. यावेळी तापमान सामान्यपेक्षा अधिक असेल. महाराष्ट्राच्या अनेक भागांत २० दिवस उष्णतेची लाट असेल. सामान्यपणे हीट वेवची स्थिती ४ ते ८ दिवसांपर्यंत असते.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडं असेल. सध्या दिवसाच नाही तर रात्रीही उष्णता जाणवू लागली आहे. राज्यात धाराशिव, नांदेड, लातूर आणि सोलापूरला उष्ण रात्रीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी वगळता यंदा राज्यात तापमान सामान्यपेक्षी अधिक असेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...