spot_img
ब्रेकिंगपाऊस आला अन पूलच गेला वाहून! नागरिकांची प्रतिक्रिया काय?

पाऊस आला अन पूलच गेला वाहून! नागरिकांची प्रतिक्रिया काय?

spot_img

निघोज | नगर सह्याद्री:-
निघोज परिसरात बुधवार दि.२५ रोजी दुपार पासून ते मध्यरात्री उशिरा पर्यंत मोठ्या प्रमाणात पाउस झाल्याने निघोज परिसरातील रामवाडी येथील पूल वाहून गेला आहे. रामवाडी व परिसरातील जनतेला निघोज व परिसरातील गावांचा संपर्क तुटला असून राज्य व केंद्र सरकारने तातडीने दखल घेऊन या ठिकाणी पुलाचे व रस्त्याचे काम करावे अशी मागणी परिसरातील रामवाडी, ढवणवाडी, पांढरकरवाडी, शिववाडी, मोरवाडी, रसाळवाडी, निघोज परिसरातील जनतेने खासदार नीलेश लंके यांच्याकडे केली आहे.

गेली वीस वर्षांपूर्वी जिल्हा परिषद माध्यमातून या परिसरातील लोकांना संबंधित गावे व वाड्या वस्त्यावरील संपर्कासाठी रामवाडीसाठी पुल दिला होता. त्यानंतर पंधरा वर्षांपूर्वी थोडीफार डागडुजी करीत या पुलाचे काम करण्यात आले होते. मात्र बुधवारच्या रात्रंदिवस पडत असलेल्या पावसामुळे तसेच संपर्कात असलेल्या नदीच्या पाण्याचा प्रवाह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्याने हा पुल वाहून गेला आहे.

तसेच रस्त्याची पुर्णपणे दुरावस्था झाली आहे. या परिसरात बागायत शेती मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच रामवाडी ढवणवाडी, पांढरकरवाडी शिववाडी, रसाळवाडी,निघोज या परिसरातील शेतकर्‍यांना जाण्यायेण्याचा मार्ग बंद झाला आहे. यासाठी तातडीने केंद्र व राज्य सरकारने तसेच खासदार नीलेश लंके यांनी अतितातडीने दखल घेत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत पुल व रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी या भागातील जनतेने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीरामपूर–बेलापूर मार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन जखमी

श्रीरामपूर/ नगर सह्याद्री    श्रीरामपूर–बेलापूर मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या राजपाल वस्त्रालय दालनासमोर गुरुवारी रात्री उशिरा...

कोठला झोपडपट्टीत गोमांस विक्री; छाप्यात १८० किलो मांस जप्त, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शासनाने प्रतिबंध केलेल्या गोमांस विक्रीवर तोफखाना पोलीसांनी कोठला झोपडपट्टीत मोठी...

राज्यात थंडीची लाट, तापमान १२.६ अंशांवर; कुठे किती…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात थंडीचा जोर वाढला असून, जळगाव, पुणे आणि नाशिकसह अनेक...

तयारीला लागा! महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट समोर; आचारसंहिता कधी पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, पहिल्या टप्प्यातील...