spot_img
ब्रेकिंगपाऊस आला अन पूलच गेला वाहून! नागरिकांची प्रतिक्रिया काय?

पाऊस आला अन पूलच गेला वाहून! नागरिकांची प्रतिक्रिया काय?

spot_img

निघोज | नगर सह्याद्री:-
निघोज परिसरात बुधवार दि.२५ रोजी दुपार पासून ते मध्यरात्री उशिरा पर्यंत मोठ्या प्रमाणात पाउस झाल्याने निघोज परिसरातील रामवाडी येथील पूल वाहून गेला आहे. रामवाडी व परिसरातील जनतेला निघोज व परिसरातील गावांचा संपर्क तुटला असून राज्य व केंद्र सरकारने तातडीने दखल घेऊन या ठिकाणी पुलाचे व रस्त्याचे काम करावे अशी मागणी परिसरातील रामवाडी, ढवणवाडी, पांढरकरवाडी, शिववाडी, मोरवाडी, रसाळवाडी, निघोज परिसरातील जनतेने खासदार नीलेश लंके यांच्याकडे केली आहे.

गेली वीस वर्षांपूर्वी जिल्हा परिषद माध्यमातून या परिसरातील लोकांना संबंधित गावे व वाड्या वस्त्यावरील संपर्कासाठी रामवाडीसाठी पुल दिला होता. त्यानंतर पंधरा वर्षांपूर्वी थोडीफार डागडुजी करीत या पुलाचे काम करण्यात आले होते. मात्र बुधवारच्या रात्रंदिवस पडत असलेल्या पावसामुळे तसेच संपर्कात असलेल्या नदीच्या पाण्याचा प्रवाह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्याने हा पुल वाहून गेला आहे.

तसेच रस्त्याची पुर्णपणे दुरावस्था झाली आहे. या परिसरात बागायत शेती मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच रामवाडी ढवणवाडी, पांढरकरवाडी शिववाडी, रसाळवाडी,निघोज या परिसरातील शेतकर्‍यांना जाण्यायेण्याचा मार्ग बंद झाला आहे. यासाठी तातडीने केंद्र व राज्य सरकारने तसेच खासदार नीलेश लंके यांनी अतितातडीने दखल घेत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत पुल व रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी या भागातील जनतेने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...