spot_img
ब्रेकिंगपाऊस आला अन पूलच गेला वाहून! नागरिकांची प्रतिक्रिया काय?

पाऊस आला अन पूलच गेला वाहून! नागरिकांची प्रतिक्रिया काय?

spot_img

निघोज | नगर सह्याद्री:-
निघोज परिसरात बुधवार दि.२५ रोजी दुपार पासून ते मध्यरात्री उशिरा पर्यंत मोठ्या प्रमाणात पाउस झाल्याने निघोज परिसरातील रामवाडी येथील पूल वाहून गेला आहे. रामवाडी व परिसरातील जनतेला निघोज व परिसरातील गावांचा संपर्क तुटला असून राज्य व केंद्र सरकारने तातडीने दखल घेऊन या ठिकाणी पुलाचे व रस्त्याचे काम करावे अशी मागणी परिसरातील रामवाडी, ढवणवाडी, पांढरकरवाडी, शिववाडी, मोरवाडी, रसाळवाडी, निघोज परिसरातील जनतेने खासदार नीलेश लंके यांच्याकडे केली आहे.

गेली वीस वर्षांपूर्वी जिल्हा परिषद माध्यमातून या परिसरातील लोकांना संबंधित गावे व वाड्या वस्त्यावरील संपर्कासाठी रामवाडीसाठी पुल दिला होता. त्यानंतर पंधरा वर्षांपूर्वी थोडीफार डागडुजी करीत या पुलाचे काम करण्यात आले होते. मात्र बुधवारच्या रात्रंदिवस पडत असलेल्या पावसामुळे तसेच संपर्कात असलेल्या नदीच्या पाण्याचा प्रवाह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्याने हा पुल वाहून गेला आहे.

तसेच रस्त्याची पुर्णपणे दुरावस्था झाली आहे. या परिसरात बागायत शेती मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच रामवाडी ढवणवाडी, पांढरकरवाडी शिववाडी, रसाळवाडी,निघोज या परिसरातील शेतकर्‍यांना जाण्यायेण्याचा मार्ग बंद झाला आहे. यासाठी तातडीने केंद्र व राज्य सरकारने तसेच खासदार नीलेश लंके यांनी अतितातडीने दखल घेत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत पुल व रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी या भागातील जनतेने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...