spot_img
अहमदनगरवाहतूक कोंडी करणार्‍यानेच पोलिसाला केली मारहाण; अहिल्यानगर मधील गंभीर प्रकार

वाहतूक कोंडी करणार्‍यानेच पोलिसाला केली मारहाण; अहिल्यानगर मधील गंभीर प्रकार

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
रस्ता वाहतूक नियमाचा भंग केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करत असल्याच्या रागातून दोघांनी अहिल्यानगर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसाला मारहाण केली. पत्रकार चौक ते डीएसपी चौक रस्त्यावरील झुलेलाल चौकात बुधवारी (9 ऑक्टोबर) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. अतुल बाजीराव लगड (वय 43) असे मारहाण झालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल संभाजीराव धोंडे (वय 36 रा. सडे ता. राहुरी), सुनील सदाशिव पटारे (वय 32, रा. वांबोरी, ता. राहुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

नेमकं प्रकरण काय?
अहिल्यानगर शहर वाहतूक शाखेत अंमलदार लगड कार्यरत आहेत. ते बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, अंमलदार लगड व इतर सहकारी झुलेलाल चौकात वाहतूक कोंडी काढत असताना तारकपूर बस स्थानकाकडून एक कार (एमएच 17 सीएक्स 9011) आली व रस्त्याचे काम सुरू असलेल्या बाजूला वळत असताना लगड यांनी त्याला त्या दिशेने वळण्यास विरोध केला. कार रस्त्यात थांबल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. याबाबत निरीक्षक बोरसे यांच्या सांगण्यावरून लगड यांनी दंडात्मक कारवाई करण्यासाठी कारचा फोटो काढला असता कार मधील व्यक्तींनी खाली उतरून लगड यांना मारहाण केली.

सरकारी कामात अडथळा; दोघांवर गुन्हा दाखल
अंमलदार लगड करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कार मधील दोघांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनीतात्काळ ताब्यात घेत तोफखाना पोलीस ठाण्यात आणले. त्यांनी त्यांची नावे अमोल संभाजीराव धोंडे, सुनील सदाशिव पटारे अशी सांगितली. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....

‘हुजूर मराठे आ रहे हे’! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला मुंबईकडे कूच करणार

बीड । नगर सहयाद्री  येत्या 29 ऑगस्ट रोजी केवळ दोन दिवसासाठी मुंबईला या, तिसऱ्या दिवशी...

…हेच माझे राजकारणातील ‘गुरु’!, माजी खासदार सुजय विखे पाटलांचे वक्तव्य चर्चेत

अहिल्यानगर । नगर सहयाद्री गुरुपौर्णिमेनिमित्त माजी खासदार व भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी शिर्डी...