spot_img
ब्रेकिंगजरांगे पाटलांच्या सभेची परवानगी नाकारली! कारण काय? वाचा सविस्तर

जरांगे पाटलांच्या सभेची परवानगी नाकारली! कारण काय? वाचा सविस्तर

spot_img

Maratha Reservation: काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या अडचणीत सतत वाढ होतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्यावर 2024 मध्ये एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील आठवड्यात दोन दिवसांत पाच गुन्हे जरांगे यांच्यावर बीडमध्ये दाखल झाले आहेत. आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना पोलिसांनी आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

मनोज जरांगे सतत वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करत बैठका घेत आहे. अशात परळी वैजिनाथ येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मार्केट यार्डात जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज मार्च सायंकाळी 6 वाजता बैठक बोलावली होती. या बैठकीची जनतेला माहिती व्हावी, यासाठी संयोजकांनी परळी शहर आणि संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांकडे ऑटोरिक्षावर ध्वनिक्षेपक वाजविण्यासाठी 13 मार्च रोजी रीतसर अर्ज केले होते. पोलिसांनी 16 मार्चला काही अटी शर्ती घातल्या. याविरोधात संयोजकांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता.

पण, लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याचे कारण देत बीड जिल्ह्यातील परळी वैजिनाथ येथे आयोजित मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने याविरोधात संयोजकांनी थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. त्यामुळे या याचिकेवरआज सकाळी सुनावणी अपेक्षित आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...