spot_img
अहमदनगरमॅनेजरने घातला मालकाला गंडा, मोठी रक्कम घेऊन पळाला

मॅनेजरने घातला मालकाला गंडा, मोठी रक्कम घेऊन पळाला

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री – 
तारकपूर येथील हॉटेल सुवर्णम रेसीडेन्सीमधील मॅनेजरने रूम भाड्याचे ग्राहकांनी पाठविलेले एक लाख ६० हजार ७६१ रूपये स्वत:च्या खात्यावर घेऊन पळून गेल्याची घटना समोर आली आहे. कुणाल रामदास वाघ (रा. पिंपळगाव जलाल, ता. येवला) असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात मंगळवारी (दि. ३०) रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

महेश नवनाथ धुमाळ (वय ३६ रा. गुलमोहोर रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. तारकपूर येथील हॉटेल सुवर्णम रेसीडेन्सीमध्ये येणार्‍या ग्राहकांवर देखरेख ठेवण्यासाठी १ डिसेंबर २०२३ पासून कुणाल रामदास वाघ याला रिसेशप्सन मॅनेजर म्हणून कामाला ठेवले होते. तो १२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुलगा आजारी असल्याने गावी जावे लागेल, असे सांगून निघून गेला. दरम्यान त्याच्याकडे ग्राहकांच्या नोंदणीबाबत चौकशी करण्यासाठी संपर्क केला असता त्याने फोन उचलले नाही.

धुमाळ यांना शंका आल्याने त्यांनी हॉटेल लॉजिंग रजिस्टर तपासले असता त्यात कुणाल वाघ याने कामावर असताना त्याच्या हस्ताक्षरात नोंदी केल्याचे दिसून आले. ग्राहकांकडून रूमचे भाडे कुणाल वाघ याने त्याच्या युपीआय खात्यावर घेतल्याचे लक्षात आले. त्यानंतर धुमाळ यांनी हॉटेल रूमच्या भाड्याचे ग्राहकांनी पाठविलेल्या पैशांचा हिशोब केला असता १ डिसेंबर २०२३ ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान एक लाख ६० हजार ७६१ रूपये कुणाल वाघ याने त्याच्या खात्यावर घेतल्याचे समोर आले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...