spot_img
अहमदनगरविधानसभेला महायुतीची वाढली डोकेदुखी; कारण काय?

विधानसभेला महायुतीची वाढली डोकेदुखी; कारण काय?

spot_img

पुणे | नगर सह्याद्री:-
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षाकडून बैठकांवर बैठका सुरू आहे. लवकरच जागावाटपाचा निर्णय हे पक्ष जाहीर करण्याची शक्यता आहे. काही पक्षांची पहिली यादी तयार असून ते लवकरच जाहीर करतील. अशामध्ये घटक पक्षामुळे महायुतीचे टेन्शन वाढलं आहे. रासपचे नेते महादेव जानकर 288 जागांवर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. महादेव जानकर हे महायुतीमधून बाहेर पडले. त्यांनी उमेदवारांची पहिली यादी तयार केली असून उमेदवाराची नावं ते लवकरच जाहीर करतील. दोन दिवसांमध्ये ही यादी जाहीर होईल.

महादेव जानकर बारामतीत उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. पहिल्या यादीत बारामतीच्या उमेदवाराचे नाव असण्याची शक्यता आहे. रासपची 100 उमेदवारांची पहिली यादी असणार आहे. महादेव जानकर महायुतीमधून बाहेर पडले आहेत. महायुतीच्या विरोधातच महादेव जानकर यांनी दंड थोपटले आहे. त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले आहे. जानकरांनी 288 विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उतरवणार असल्याचे काही दिवसांपूव जाहीर करत महायुतीला इशारा दिला होता.

पहिल्या यादीत सुमारे 25 उमेदवारांना तिकीट मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेली अनेक वर्षे रासपचे काम करीत असलेल्या पदाधिकाऱ्यांना यादीत संधी मिळणार आहे. बारामतीमध्ये रासपचे जिल्हाध्यक्ष राहीलेल्या संदीप चोपडे यांना रासपचे तिकीट मिळणार आहे. ते पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य आहेत.

महादेव जानकर यांना राज्यपाल नियुक्त यादीत नाव असेल असं आश्वासन महायुतीने दिलं होतं. मात्र नाव नसल्याने जानकर नाराज झाले आणि त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परभणी लोकसभेला पराभूत झाल्यानंतर महादेव जानकर राज्यपाल नियुक्त कोट्यातून इच्छुक होते. महायुतीने विचारात न घेतल्याने महादेव जानकर नाराज होते. अखेर त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...