spot_img
ब्रेकिंगसाईभक्तांवर काळाची झडप; भरधाव वाहनाने तिघांना उडवलं, कुठे घडली घटना?

साईभक्तांवर काळाची झडप; भरधाव वाहनाने तिघांना उडवलं, कुठे घडली घटना?

spot_img

Accident News: साई पालखीसोबत पायी चालत जाणाऱ्या तिघा साईभक्तांवर काळाने झडप घातली आहे. भरधाव कारच्या धडकेत तीन साईभक्तांचा मृत्यू झाला आहे. घोटी-सिन्नरदरम्यान ही घटना घडली असून, तिन्ही जण टिटवाळा मांडा कोळीवाडा परिसरातील रहिवासी होते.

या अपघातात भावेश राम पाटील, रवींद्र उर्फ कवी सुरेश पाटील, आणि साईराज भोईर या तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताला १६ तासांहून अधिक कालावधी उलटून गेला तरी पोलिसांनी वाहनचालकाला शोधलेले नाही, तसेच कारवाई केलेली नाही, असा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

अधिक माहिती अशी: साई आश्रय सेवा मंडळातर्फे शिर्डी येथे पायी चालत पालखी नेली जाते. या पालखीत या परिसरातील सुमारे दीडशे जण सहभागी होतात. यंदा देखील शनिवारी, १३ तारखेला पालखी टिटवाळ्याहून शिर्डीच्या दिशेने पायी निघाली. या पालखीसोबत रवींद्र पाटील, भावेश पाटील, साईराज भोईर, आणि सलमान खान हे चौघे होते.

मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पालखी घोटी आणि सिन्नरदरम्यान पोहोचली. रवींद्र पाटील, भावेश पाटील, साईराज भोईर, आणि सलमान खान या चौघांना भरधाव वाहनाने उडवले. या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सलमानवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईड सैफुल्ला खालिद कसुरी? वाचा, माहिती..

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम शहराजवळील 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन...

स्कुटीवर चाललेल्या दोन महिलावर अ‍ॅसीड फेकले; अहिल्यानगर जिल्ह्यात भयंकर प्रकार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील फत्त्याबाद येथील माजी सरपंच बाबासाहेब बाळाजी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी आजचा दिवस सर्वोत्कृष्ट

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आज तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल –...

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...