spot_img
ब्रेकिंगसाईभक्तांवर काळाची झडप; भरधाव वाहनाने तिघांना उडवलं, कुठे घडली घटना?

साईभक्तांवर काळाची झडप; भरधाव वाहनाने तिघांना उडवलं, कुठे घडली घटना?

spot_img

Accident News: साई पालखीसोबत पायी चालत जाणाऱ्या तिघा साईभक्तांवर काळाने झडप घातली आहे. भरधाव कारच्या धडकेत तीन साईभक्तांचा मृत्यू झाला आहे. घोटी-सिन्नरदरम्यान ही घटना घडली असून, तिन्ही जण टिटवाळा मांडा कोळीवाडा परिसरातील रहिवासी होते.

या अपघातात भावेश राम पाटील, रवींद्र उर्फ कवी सुरेश पाटील, आणि साईराज भोईर या तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताला १६ तासांहून अधिक कालावधी उलटून गेला तरी पोलिसांनी वाहनचालकाला शोधलेले नाही, तसेच कारवाई केलेली नाही, असा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

अधिक माहिती अशी: साई आश्रय सेवा मंडळातर्फे शिर्डी येथे पायी चालत पालखी नेली जाते. या पालखीत या परिसरातील सुमारे दीडशे जण सहभागी होतात. यंदा देखील शनिवारी, १३ तारखेला पालखी टिटवाळ्याहून शिर्डीच्या दिशेने पायी निघाली. या पालखीसोबत रवींद्र पाटील, भावेश पाटील, साईराज भोईर, आणि सलमान खान हे चौघे होते.

मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पालखी घोटी आणि सिन्नरदरम्यान पोहोचली. रवींद्र पाटील, भावेश पाटील, साईराज भोईर, आणि सलमान खान या चौघांना भरधाव वाहनाने उडवले. या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सलमानवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...