spot_img
ब्रेकिंगसाईभक्तांवर काळाची झडप; भरधाव वाहनाने तिघांना उडवलं, कुठे घडली घटना?

साईभक्तांवर काळाची झडप; भरधाव वाहनाने तिघांना उडवलं, कुठे घडली घटना?

spot_img

Accident News: साई पालखीसोबत पायी चालत जाणाऱ्या तिघा साईभक्तांवर काळाने झडप घातली आहे. भरधाव कारच्या धडकेत तीन साईभक्तांचा मृत्यू झाला आहे. घोटी-सिन्नरदरम्यान ही घटना घडली असून, तिन्ही जण टिटवाळा मांडा कोळीवाडा परिसरातील रहिवासी होते.

या अपघातात भावेश राम पाटील, रवींद्र उर्फ कवी सुरेश पाटील, आणि साईराज भोईर या तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताला १६ तासांहून अधिक कालावधी उलटून गेला तरी पोलिसांनी वाहनचालकाला शोधलेले नाही, तसेच कारवाई केलेली नाही, असा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

अधिक माहिती अशी: साई आश्रय सेवा मंडळातर्फे शिर्डी येथे पायी चालत पालखी नेली जाते. या पालखीत या परिसरातील सुमारे दीडशे जण सहभागी होतात. यंदा देखील शनिवारी, १३ तारखेला पालखी टिटवाळ्याहून शिर्डीच्या दिशेने पायी निघाली. या पालखीसोबत रवींद्र पाटील, भावेश पाटील, साईराज भोईर, आणि सलमान खान हे चौघे होते.

मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पालखी घोटी आणि सिन्नरदरम्यान पोहोचली. रवींद्र पाटील, भावेश पाटील, साईराज भोईर, आणि सलमान खान या चौघांना भरधाव वाहनाने उडवले. या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सलमानवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंना लीन चीट

मुंबई । नगर सहयाद्री सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनची हत्या झाल्याचं किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा...

आरोपात तथ्य नाही; मानहानीचा दावा दाखल करणार, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकरांनी फेटाळले आरोप!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री सर्व आरोप निराधार, तथ्यहीन आणि खोटे आहेत. व्हायरल व्हिडिओ माझ्याच...

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी!; ‘त्या’ यादीत आपले नाव आहे का? ते पाहा…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री;- नगर अर्बन बँकेत पाच लाखाहून अधिक रकमेच्या ठेवी अडकलेल्या ठेवीदारांना निम्मी...

आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी; ‘दो दिन के अंदर…’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार संग्राम जगताप  यांना...