spot_img
ब्रेकिंगसाईभक्तांवर काळाची झडप; भरधाव वाहनाने तिघांना उडवलं, कुठे घडली घटना?

साईभक्तांवर काळाची झडप; भरधाव वाहनाने तिघांना उडवलं, कुठे घडली घटना?

spot_img

Accident News: साई पालखीसोबत पायी चालत जाणाऱ्या तिघा साईभक्तांवर काळाने झडप घातली आहे. भरधाव कारच्या धडकेत तीन साईभक्तांचा मृत्यू झाला आहे. घोटी-सिन्नरदरम्यान ही घटना घडली असून, तिन्ही जण टिटवाळा मांडा कोळीवाडा परिसरातील रहिवासी होते.

या अपघातात भावेश राम पाटील, रवींद्र उर्फ कवी सुरेश पाटील, आणि साईराज भोईर या तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताला १६ तासांहून अधिक कालावधी उलटून गेला तरी पोलिसांनी वाहनचालकाला शोधलेले नाही, तसेच कारवाई केलेली नाही, असा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

अधिक माहिती अशी: साई आश्रय सेवा मंडळातर्फे शिर्डी येथे पायी चालत पालखी नेली जाते. या पालखीत या परिसरातील सुमारे दीडशे जण सहभागी होतात. यंदा देखील शनिवारी, १३ तारखेला पालखी टिटवाळ्याहून शिर्डीच्या दिशेने पायी निघाली. या पालखीसोबत रवींद्र पाटील, भावेश पाटील, साईराज भोईर, आणि सलमान खान हे चौघे होते.

मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पालखी घोटी आणि सिन्नरदरम्यान पोहोचली. रवींद्र पाटील, भावेश पाटील, साईराज भोईर, आणि सलमान खान या चौघांना भरधाव वाहनाने उडवले. या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सलमानवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह, शहरात खळबळ

Maharashtra Crime News : डोंबिवलीमधील डायघर परिसरातील खाडीत एका सुटकेसमध्ये २५ महिलेचा मृतदेह सापडला...

पारनेरचा चेतन रेपाळे उत्तर महाराष्ट्र केसरी; धुळ्याच्या ऋतिकला केले चितपट, ‘असा’ टाकला डाव..

पारनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा; शिव छत्रपती संकुलचे नाव राज्यस्तरावर पारनेर | नगर सह्याद्री नाशिक जिल्ह्यातील पाथड...

नगर शहरात चाललंय काय?, अल्पवयीन मुलाचा खुनाचा केला प्रयत्न, वाचा, नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात सोमवार दि. २४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या...

राममंदिराच्या शिखरावर भगवा फडकला! अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वाजारोहण, VIDEO समोर

अयोध्या | नगर सह्याद्री अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यावर आता आज सन्मानाने मंदिरावर...