spot_img
अहमदनगरसाहेब आणि दादांच्या पश्चात जीएस महानगर बँकेत निर्माण झालेली हुकुमशाही, अरेरावी सभासद...

साहेब आणि दादांच्या पश्चात जीएस महानगर बँकेत निर्माण झालेली हुकुमशाही, अरेरावी सभासद मोडीत काढतील; श्रीमती गीतांजली शेळके यांनी व्यक्त केला विश्वास

spot_img

सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलच्या प्रमुख श्रीमती गीतांजली शेळके | साहेबांच्या अन्‌‍ उदयदादांच्या स्वप्नातील महानगर परिवार गतीमान करणार
थेट भेट / शिवाजी शिर्के
मोठ्या साहेबांसह दादांच्या तत्वावर ज्यापद्धतीने बँक चालली, त्याच पद्धतीने सभासद हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पारदर्शक व्यवहार, सभासदांसह कर्मचाऱ्यांना आणि खातेदारांना सन्मानाची वागणूक, बँकेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य आणि संचालकांमध्ये एकजीनसीपणा ठेवण्यासह निर्णयात तत्परता ठेवणारे संचालक मंडळ सभासदांना दिसेल. दादांच्या पश्चात गेल्या अडीच वर्षात बँकेत निर्माण झालेली हुकुमशाही, अरेरावी मोडीत काढण्याचे काम सभासदच मतदानातून करतील आणि बँकेत सेवा करण्याची संधी देतील असा विश्वास जीएस महानगर बँक संचालक मंडळ निवडणुकीतील सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलच्या प्रमुख श्रीमती गीतांजली उदयराव शेळके यांनी ‌‘नगर सह्याद्री‌’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये व्यक्त केला.

मतभेदाचे सोडा; मनभेद निर्माण केले गेले, त्याचे काय?
साहेबांना आणि दादांना त्रास देणाऱ्यांना सोबत घेतल्याच्या आरोप तथ्य नाही. आधी तर त्यांनीच यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी हा विचार का आला नाही. तात्वीक वाद त्यावेळी त्यांच्यात असतीलही. मतभेद असले तरी त्यांच्यात मला कधीही मनभेद दिसला नाही. ज्यांच्याकडून मनभेदाची अपेक्षा नव्हती त्यांच्याकडून माझ्यासह माझ्या दोन मुलींबाबत प्रचंड मनभेद उभे केले गेले, त्याचे काय? दादांच्या जाण्यानंतर मला जो त्रास, मनस्ताप दिला गेला त्याचे काय?

बोलण्यासारखे खूप आहे, मला बोलायला भाग पाडू नका!
निवडणूक बँकेची आहे. ही बँक सभासदांची आहे. त्यांच्याच कष्टातील पैशाने आज ती उभी आहे. साहेब आणि दादा असताना त्यांनी ही बँक तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली. त्यांच्या पश्चात ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याची गरज असताना संबंध नसताना काहींनी नाक खुपसले. आईंच्यात आणि आमच्यात वाद नाही आणि नव्हताही! मात्र, बँकेच्या हिताला बाधा आणणारे काही प्रसंग निर्माण केले आणि त्याला माझ्यासह माझ्यासोबतच्या संचालकांनी विरोध केला. खरेतर बोलण्यासारखे खूप आहे. मी बोलणार नाही आणि मला बोलायला भाग देखील पाडू नका!

खातेदार, सभासद, कर्मचारी साऱ्यांनाच तुसडेपणाची वागणूक!
साहेब आणि दादांच्या पारदश भूमिकेतून बँक चालवायची भूमिका मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी घेतली आहे. दुर्दैवाने गेल्या दोन- अडीच वर्षात त्यास खिळ बसली आहे. दोन अडीच वर्षात माझ्यासह माझ्या दोन मुलींना आणि सभासदांना जी प्रेमाची वागणूक भेटायला पाहिजे होती, ती भेटलीच नाही. अधिकारी आणि कर्मचारी हे बँकेचा कणा असताना त्यांना घरगड्यासारखी वागणूक दिली गेली. साहेबांनी आणि दादांनी खातेदार, सभासद, कर्मचारी साऱ्यांनाच सन्मानाची वागणूक दिली असताना गेल्या अडीच वर्षात या साऱ्यांच्या वाट्याला तुसडेपणाची वागणूक आली.

सोबतचे सन्मान आणि स्वाभिमानी बाण्यानेच जवळ आले!
आचार, विचार आणि लोकशाहीचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. साहेबांसह उदयदादांनी देखील तेच संस्कार माझ्यावर केले. या निवडणुकीत माझ्यासोबत विद्यमान संचालक मंडळातील बारा- तेरा संचालक स्वत:हून आले. मी त्यांना बोलावले नव्हते. मात्र, त्यांना गेल्या अडीच वर्षात सातत्याने सापत्न आणि अपमानास्पद वागणूक दिली गेली. सन्मान आणि स्वाभिमानी बाणा जपण्याची भूमिका आम्ही सर्वांनीच घेतली आहे.

अंधार दिसू लागल्याने मी निवडणुकीत!
सभासदांसह हितचिंतकांना गेल्या अडीच वर्षात मिळालेली वागणूक आणि त्यांना बँकेच्या भविष्याबाबत अंधार दिसू लागल्याने त्यांनी मला पुढाकार घेण्याची विनंती केली. साहेब आणि दादांच्या तत्वावर बँक चालवायची असेल तर तुम्ही पुढाकार घ्या, अशी विनंती साऱ्यांनीच केली आणि त्यातूनच मी मतदारांसमोर गेली आहे. माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विद्यमान संचालक मंडळातील बारा- तेरा संचालक सोबत आलेत. नव्यांची भर त्यात पडली आहे.

कष्टकऱ्यांच्या घामाचा पैसा, आम्ही फक्त विश्वस्त!
साहेबांच्या नेतृत्वात बँकेची स्थापना झाली आणि आज त्या बँकेची वाटचाल पाच हजार कोटींच्या ठेवीकडे आहे. खरेतर कष्टकऱ्यांच्या पैशातून ही बँक उभी राहिली आणि त्या बँकेत मालकाच्या भूमिकेत न राहता विश्वस्ताच्या भूमिकेत राहून स्व. शेळके साहेब आणि उदयदादा या दोघांनी शेवटपर्यंत काम केले. त्या भूमिकेशी माझ्यासह माझ्या नेतृत्वाखालील निवडणुकीत उतरलेले संचालक मंडळ कधीही प्रतारणा होऊ देणार नाही.

आईंच्या पदराआड लपलेल्यांना ओळखा!
गेल्या अडीच वर्षात बँकेत हुकुमशाही पद्धतीने कामकाज झाले. बँकेच्या अध्यक्षा म्हणून आदरणीय आई काम पाहत असल्या तरी त्या शांतच होत्या. त्यांच्या पदराआड काहीच संबंध नसणाऱ्यांनी घुसखोरी केली आणि अडीच वर्षे साऱ्यांनाच वेठीस धरले. आता सभासदांनाच याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. आईच्या पदराआड राहून बँकेच्या हिताला बाधा आणणारे दुसरे कोणीतरी काम पाहत होते आणि ते कोण पाहत होते हे मी सांगण्याची गरज नाही.

चेअरमनच्या केबीनमधील दुसरा टेबल हटवा!
स्व. साहेब आणि स्व. उदयदादा या दोघांच्याच नव्हे तर बँकेच्या स्थापनेपासून ते गेल्या अडीच वर्षापूवपर्यंत बँकेच्या चेअरमन केबीनमध्ये फक्त चेअरमनचा एकमेव टेबल होता. मात्र, अडीच वर्षापूव दादांच्या निधनानंतर अचानक चेअमरनच्या केबीनमध्ये दोन टेबल मांडले गेले. अडीच वर्षांपासून हे दोन टेबल आजही कायम आहेत. चेअरमनसाठीचा मुख्य टेबल फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका घेत राहिला आणि दुसऱ्या टेबलपासून निर्णय घ्यायला सुरुवात झाली. या दुसऱ्या टेबलने मनमानी पद्धतीने हुकुमशाही केली. आता हा दुसरा टेबल कायमचा हद्दपार करण्याची भूमिका सभासद मतदानातून घेतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हुंडाबळीची थरारक घटना! विवाहितेचा छळ, गळफास घेत आयुष्य संपवलं

अमरावती / नगर सह्याद्री - पुणे आणि नाशिकनंतर आता अमरावतीमध्येही हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून आत्महत्येस...

शाब्बास, अतिक्रमणात दांडक्याचीच होती गरज; आडकाठी मोडीत काढल्याने नगरकरांकडून कौतुक

आडकाठी मोडीत काढल्याने नगरकरांकडून कौतुक | डीवायएसपी अमोल भारतींची खमकी भूमिका | डांगे साहेब,...

..तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट; हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट

गेले काही दिवस राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले....

जीएस महानगर बँक संचालक मंडळ निवडणूक; सहानुभूतीची लाट कुणाच्या बाजूने?, वाचा सविस्तर..

एकहाती प्रचारयंत्रणा | सभांच्या जोडीने प्रत्यक्ष गाठीभेठीवर भर | कर्मचाऱ्यांमधूनही समर्थनाची निर्माण झाली लाट पारनेर...