spot_img
अहमदनगरनगर तालुक्यात पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान; पालकमंत्र्यांनी दिले असे आदेश, काय म्हणाले...

नगर तालुक्यात पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान; पालकमंत्र्यांनी दिले असे आदेश, काय म्हणाले पहा…

spot_img

सुनील चोभे | नगर सह्याद्री
सतत होणार्‍या पावसामुळे पूर्वा व वालुंबा नदीला पूर आला होता. पुरामुळे अकोळनेर, भोरवाडी, सारोळा कासार, खडकी, वाळकी परिसरातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात शेळ्या, गायी, बैल, म्हैस वाहून गेल्या आहेत. घरात पाणी शिरल्याने धान्य भिजले आहे. संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्याचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. दरम्यान, शासन स्तरावर नुकसान भरपाईबाबत निर्णय घेऊन तातडीने मदत मिळवून देवू असे आश्‍वासन मंत्री विखे पाटील यांनी शेतकर्‍यांना दिले.

मंगळवारी नगर तालुक्यात ढगफुटी सदृष पाऊस झाला. या पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोळनेर, खडकी येथे केली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार काशीनाथ दाते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, माजी सभापती अभिलाष पाटील घिगे, सरपंच भाऊसाहेब बहिरट, प्रतिक शेळके, माजी सरपंच प्रविण कोठुळे, राघु चोभे, मनेष भोसले, बाळासाहेब कोठुळे, राहुल बहिरट यांच्यासह अकोळनेर व खडकी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या भावना समजून घेतल्या. नुकसान झाले त्या ठिकाणची पाहणी केली. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना, महिलांना पालकमंत्र्यांसमोर अश्रू अनावर झाले. पालकमंत्र्यांनी नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांना धीर देत तातडीने संबंधित अधिकार्‍यांना नुकसान झालेल्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच सरकार दरबारी पाठपुरावा करुन तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.

अविरत पडणार्‍या मुसळधार पावसाुळे जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील खडकी व वाळकी गावामध्ये गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. गावाध्ये पाण्याची पातळी करेपर्यंत पोहोचली होती. पुराच्या पाण्यात रहिवासी अडकून पडले होते. पुरात अडकलेल्या नागरिकांना लष्कराच्या दतीने खडकी येथून 10 व वाळकी येथून 15 जणांना बाहेर काढण्यात आले.

दरम्यान बुधवार सकाळपासून नुकसानग्रस्त भागात महसूल प्रशासनाच्यावतीने पंचनामे करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पुराच्या पाण्यामुळे 100 पेक्षा अधिक जनावरे व 200 शेळ्या वाहून गेल्या असल्याची माहिती मिळत आहे. महावितरणचे सुमारे 200-300 पोल पडले आहेत. विद्युत रोहित्र पडले असल्यामुळे गावागावांमध्ये विजेचा खेळखंडोबा झाला आहे. धो धो पावसामुळे रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. पूल वाहून गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...