spot_img
अहमदनगरमहानाट्यावर लवकरच पडदा पडणार!! मंत्री विखे यांचा आ. लंके यांना अप्रत्यक्ष टोला

महानाट्यावर लवकरच पडदा पडणार!! मंत्री विखे यांचा आ. लंके यांना अप्रत्यक्ष टोला

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
लोकसभेच्या नगरच्या जागेसाठी अनेक इच्छुक आहेत. त्या सर्वांच्या नावाची चर्चा होत आहे. पक्षाच्या निरीक्षकांनी अहवाल सादर केला आहे. त्यावर मुख्य निवडणूक समिती निर्णय घेईल. महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे वेळ लागतो आहे असे वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तसेच त्यांनी महानाट्यावर लवकरच पडदा पडेल असे वक्तव्य करत आ. नीलेश लंके यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर उपकेंद्राचे इमारतीचे उदघाटन मंत्री विखे पाटील यांच्या होते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी आ. लंके यांच्यावर अप्रत्यक्ष टोला मारत टीका केली आहे. ते म्हणाले, महानाट्य दोन किंवा जास्तीत जास्त तीन अंकी असते. त्यावर लवकर पडदा पडेल. महानाट्य फारकाळ चालणार नाही. लोकसभेसाठी कोण कुठे जाते, याची मला चिंता नाही.

कारण महायुतीला राज्यात शंभर टक्के यश मिळणार आहे. त्यामुळे कोण कोणाच्या मानेवर जाऊन बसते याला मी फार महत्त्व देत नाही, असा टोला मंत्री विखे यांनी अप्रत्यक्षपणे आमदार निलेश लंके यांच्या लोकसभा निवडणुकीतील संभाव्य भूमिकेवर लगावला आहे.

मराठा समाजाच्या प्रश्नाचे राजकारण करणे बंद करा
मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलेले आहे. विधानसभा आणि विधान परिषदेने ते मान्य केलेले आहे. महायुती सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असे विजय वडेट्टीवारांना वाटत असेल, तर ते विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी सभागृहात तसे सांगितले पाहिजे होते. तेव्हा तर ते म्हणाले, एकमताने ठराव करा. आता त्यांना कोणती उपरती सुचली आहे? मराठा समाजाच्या प्रश्नाचे राजकारण करणे बंद केले पाहिजे, असा टोला महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वडेट्टीवार यांना लगावला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...