spot_img
ब्रेकिंगमाझं पाकीट मारलं तर चोरालाही टेन्शन...? एसआयटी चौकशीवर जरांगे पाटील स्पष्टच बोलले,...

माझं पाकीट मारलं तर चोरालाही टेन्शन…? एसआयटी चौकशीवर जरांगे पाटील स्पष्टच बोलले, वाचा सविस्तर

spot_img

सोलापूर । नगर सहयाद्री-
सगेसोयगरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून कायद्यात रुपांतर करा, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सगेसोयर्‍यांचा मुद्दा मिटल्याशिवाय निवडणुका घेतल्या, तर मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

तसेच मी एसआयटी चौकशीला अजिबात घाबरत नाही. कारण मी कुणाचाही एक रुपया खाल्लेला नाही. माझं पाकिट चोरलं, तर उलट चोरालाही टेन्शन येईल असा टोलाही त्यांनी एसआयटी चौकशीवरून लगावला. सध्या जरांगेंनी संवाद दौरा सुरू केला असून आज (४ मार्च) ते सोलापुरात आहेत. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, बार्शी तालुयातील वैराग येथे सोमवारी दुपारी ११ वाजता मनोज जरांगेंचं आगमन झालं. यावेळी मराठा बांधवांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्य सरकारवर निशाणा साधला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी तुम्हाला काहीच बोललो नाही. तरी पण तुम्हाला माझे शब्द लागले असतील, तर ज्यावेळी अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीमारात मराठा बांधव-भगिनींची डोकी फुटली, त्यावेळी तुम्हाला आई-बहीण दिसली नाही का?, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला.

तुम्हाला मी एक शब्द बोललो, तर इतका लागला. पण माझ्या आई-बहिणींना तुम्ही केलेल्या लाठीमारामुळे आजही शेतात जाता येत नाही. त्यांचे पाय मोडले आहेत. त्यावेळेस तुम्हाला थोडी कशी लाज वाटली नाही, अशी घणाघाती टीका देखील जरांगे यांनी फडणवीसांवर केली.

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी जेव्हा संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होतो, तेव्हा सरकारने माझ्यावर एसआयटी नेमली. मी एसआयटी चौकशीला अजिबात घाबरत नाही. कारण मी कुणाचाही एक रुपया खाल्लेला नाही. माझं पाकिट चोरलं, तर उलट चोरालाही टेन्शन येईल, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....

‘हुजूर मराठे आ रहे हे’! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला मुंबईकडे कूच करणार

बीड । नगर सहयाद्री  येत्या 29 ऑगस्ट रोजी केवळ दोन दिवसासाठी मुंबईला या, तिसऱ्या दिवशी...