spot_img
अहमदनगरकचरा डेपोला वारंवार आग! आयुक्तांनी काढले ठेकेदाराला आदेश, भरावा लागणार इतका दंड?

कचरा डेपोला वारंवार आग! आयुक्तांनी काढले ठेकेदाराला आदेश, भरावा लागणार इतका दंड?

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
बुरुडगाव कचरा डेपोत १०० टन क्षमतेच्या खत प्रकल्पातील कचर्‍याला वारंवार आग लागण्याची घटना घडत आहेत. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायू प्रदूषण झाल्याचा अहवालही दिला आहे. महापालिकेने वारंवार सूचना देऊनही व पाण्याची व्यवस्था उपलब्ध करूनही सुरक्षेबाबत ठेकेदार संस्थेने उपाययोजना न केल्याने मागील महिन्यात पुन्हा आग लागली. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार ठेकेदार संस्थेला नोटीस बजावून एप्रिल २०२३ पासून प्रतिदिन ५ हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश आयुक्त पंकज जावळे यांनी दिले आहेत.

बुरुडगाव येथील १०० टन क्षमतेच्या खतनिर्मीती प्रकल्पात मागील वर्षी एप्रिल महिन्यात मोठी आग लागली होती. वर्षभरानंतरही या आगीची धग कायम असल्याने व धुरामुळे वायूप्रदूषण होत असल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला होता. त्यानंतरही उपाययोजना न केल्याने १९ एप्रिल रोजी दुपारी पुन्हा आग लागली. हा प्रकल्प चालवणार्‍या मे. मायोव्हेसल्स अ‍ॅन्ड मशीन्स या संस्थेने सुरक्षेविषयक उपाययोजना करणे आवश्यक होते.

तसे न केल्याने ही आग लागल्याचे घनकचरा विभागाने म्हटले आहे. मनपाने या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करुन देखील सदर संस्थेने उपाययोजना केलेल्या नाहीत. हा प्रकार मनपाची फसवणूक व नुकसान करणारा आहे. करारनाम्यातील अटीनुसार याबाबत प्रतिदिन ५ हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यानुसार एप्रिल २०२३ पासून दंड आकारणी करण्याचे आदेश आयुक्त पंकज जावळे यांनी दिले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...