spot_img
ब्रेकिंगशहर हादरलं..! साजिदने दोन सख्ख्या भावांना संपवल; 'तो' नाक्यावर पोहोचताच पोलिसांनी 'असा'...

शहर हादरलं..! साजिदने दोन सख्ख्या भावांना संपवल; ‘तो’ नाक्यावर पोहोचताच पोलिसांनी ‘असा’ केला एन्काऊंटर

spot_img

Crime News: उत्तर प्रदेशच बदायू शहर एका भयंकर कर्त्याने हादरलं आहे. दोन सख्ख्या भावांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. साजिदने घरात घुसून कुऱ्हाडीचे घाव घालून दोन लहान मुलांना संपवलं. अन्य एका मुलावरही त्याने हल्ला केला. हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी साजिद घरातून पळाला. तो नाक्यावर पोहोचला होता, तिथेच पोलिसांनी त्याच एन्काऊंटर केला.

वृत्त संस्थाच्या माहितीनुसार, सिविल लाइन क्षेत्राच्या बाबा कॉलनीमध्ये साजिद नावाचा एक युवक सलून शॉप चालवायचा. कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका माणसाचा सोमवारी साजिद बरोबर वाद झाला होता. तेव्हापासून साजिदच्या मनात राग धुमसत होता.

आरोपीने घरात वाद झालेल्या इसमाच्या घरात घुसून मुलांवर हल्ला केला. आरोपीने आयूष (१२) आणि त्याचा लहान भाऊ आहान उर्फ हनी (८) यांची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. तसेच त्यांच्याबरोबर खेळ असलेला आणखी मुलगा पियूषवरही (७) त्याने हल्ला केला. गुन्हा केल्यानंतर साजिद तिथून पळाला. दोन भावाचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्या पडलेले होते.

कॉलनीच्या लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. लोकांनी सर्वप्रथम साजिदच सूलनच दुकान पेटवून दिलं. तो जवळच्या एका जंगलात लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी याठिकाणी पोहोचत आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांवरही गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनीही आरोपीवर गोळीबार केला. यात आरोपीचा एन्काऊंटर झाला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...