spot_img
ब्रेकिंगशहर हादरलं..! साजिदने दोन सख्ख्या भावांना संपवल; 'तो' नाक्यावर पोहोचताच पोलिसांनी 'असा'...

शहर हादरलं..! साजिदने दोन सख्ख्या भावांना संपवल; ‘तो’ नाक्यावर पोहोचताच पोलिसांनी ‘असा’ केला एन्काऊंटर

spot_img

Crime News: उत्तर प्रदेशच बदायू शहर एका भयंकर कर्त्याने हादरलं आहे. दोन सख्ख्या भावांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. साजिदने घरात घुसून कुऱ्हाडीचे घाव घालून दोन लहान मुलांना संपवलं. अन्य एका मुलावरही त्याने हल्ला केला. हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी साजिद घरातून पळाला. तो नाक्यावर पोहोचला होता, तिथेच पोलिसांनी त्याच एन्काऊंटर केला.

वृत्त संस्थाच्या माहितीनुसार, सिविल लाइन क्षेत्राच्या बाबा कॉलनीमध्ये साजिद नावाचा एक युवक सलून शॉप चालवायचा. कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका माणसाचा सोमवारी साजिद बरोबर वाद झाला होता. तेव्हापासून साजिदच्या मनात राग धुमसत होता.

आरोपीने घरात वाद झालेल्या इसमाच्या घरात घुसून मुलांवर हल्ला केला. आरोपीने आयूष (१२) आणि त्याचा लहान भाऊ आहान उर्फ हनी (८) यांची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. तसेच त्यांच्याबरोबर खेळ असलेला आणखी मुलगा पियूषवरही (७) त्याने हल्ला केला. गुन्हा केल्यानंतर साजिद तिथून पळाला. दोन भावाचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्या पडलेले होते.

कॉलनीच्या लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. लोकांनी सर्वप्रथम साजिदच सूलनच दुकान पेटवून दिलं. तो जवळच्या एका जंगलात लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी याठिकाणी पोहोचत आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांवरही गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनीही आरोपीवर गोळीबार केला. यात आरोपीचा एन्काऊंटर झाला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगर नव्हे आता अहिल्यानगर रेल्वेस्थानक, रेल्वेस्टेशनचेही नाव बदलले, सरकारकडून प्रक्रिया पूर्ण

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : अहिल्यानगरचे नामांतर केल्यानंतर आता रेल्वेस्थानकाच्या नामांतराचीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे....

तयारीला लागा! जिल्हा परिषद अध्यक्ष पदांच्या आरक्षणाचा फुगा फुटला, अनेक दिग्गजांना मोठा धक्का, कुठे काय निघाले आरक्षण पहा

अहिल्यानगर झेडपीचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव / जिल्ह्यातील दिग्गजांना मोठा धक्का | राज्यातील...

एसईबीसी, ईडब्लूएस, ओपन आरक्षण नको का?; मंत्री छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले पहा

मराठा समाजाला सवाल | नेत्यांनाही धरले धारेवर नाशिक | नगर सह्याद्री राज्यातील मराठा समाजाला आतापर्यंत त्यांच्यासाठी...

धक्कादायक! हायकोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी, दिल्ली, मुंबईत खळबळ

नवी दिल्ली | वृत्तसंस्था दिल्लीतील नामांकित शाळा बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी ताजी असतानाच आता...