spot_img
राजकारणसर्वात मोठी बातमी ! काँग्रेसचे १२ खासदार, ४० आमदार भाजपत? प्रक्रियेसाठी भाजपकडून...

सर्वात मोठी बातमी ! काँग्रेसचे १२ खासदार, ४० आमदार भाजपत? प्रक्रियेसाठी भाजपकडून चार सदस्यीय समिती स्थापन

spot_img

नवी दिल्ली / नगर सहयाद्री : आगामी लोकसभा निवडणुकात ५४३ पैकी ३७० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. भाजपने लोकसभेच्या १६१ जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. ज्या कधीच जिंकल्या नाहीत, त्या जागा त्यांना आता जिंकायच्या आहेत.

त्यासाठी भाजपला इतर पक्षांच्या नेत्यांची मदत घ्यावी लागेल. त्यासाठी भाजप इतर पक्षांच्या निवडक नेत्यांसाठी आपले दरवाजे खुले करतांना सध्या दिसत आहे. त्यामुळे अशा नेत्यांच्या प्रवेशाची तपासणी करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस विनोद तावडे आणि सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांचा या समितीत समावेश आहे.

काँग्रेसचे डझनभर खासदार, ४० आमदार आणि इतर प्रमुख नेते पुढील तीन आठवड्यांत टप्प्याटप्प्याने पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे वृत्त आहे. समितीचे लक्ष त्या राज्यांवर केंद्रित आहे जिथे भाजपचे मोठे अस्तित्व आहे. परंतु तरीही ते अशा जागा जिंकू इच्छित आहेत जिथे पक्षाची ताकद कमी आहे.

लक्ष्य किती कुठे?
समितीचे पंजाब, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांवर विशेष लक्ष आहे. उर्वरित दक्षिणेकडील राज्यांसाठी भाजपने १० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

महाराष्ट्रात काय?
महाराष्ट्र, आसाम, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश या राज्यात भाजपचे अधिकाधिक जागांवर लक्ष आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...

नगरमध्ये चाललंय काय? दोन दिवसात ‘इतक्या’ अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीसह मुलाचे अपहरण केल्याच्या...

गोदावरीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पहा कुठे काय परस्थिती?

नाशिक । नगर सहयाद्री :- नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांची प्रतिक्षा अखेर संपली असून...