spot_img
महाराष्ट्रतलाठी भरती घोटाळ्यावरून वातावरण तापले ! आंदोलकांचा दादर स्थानकात गोंधळ,लोकल अडवली

तलाठी भरती घोटाळ्यावरून वातावरण तापले ! आंदोलकांचा दादर स्थानकात गोंधळ,लोकल अडवली

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : मागील काही दिवसांपासून राज्यभरात तलाठी भरती घोटाळा गाजत आहे. आता या मुद्द्यांवरून वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस पक्ष आता आक्रमक झाला असून आंदोलकांनी दादर स्थानकात गोंधळ घालत लोकल अडवण्याचा प्रयत्न केला आहे.

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला. तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशी करून घोटाळ्यामागील मास्टरमाईंड शोधा, अशी प्रमुख मागणी करत कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी रूळांवर मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उतरल्याने पश्चिम रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. संध्याकाळच्या सुमारास कार्यालयातून घरी जाणाऱ्या मुंबईकरांना या आंदोलनाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

या आंदोलनामुळे साधारण पुढील ४० ते ५० मिनिटे रेल्वे वाहतुकीचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. राज्यात तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला आहे. त्याचे पुरावे आमच्याकडे मागितले जात आहेत. एवढंच नाही तर आम्ही पुरावे दिल्यानंतरही कारवाई केली जात नाही. त्यामुळे आम्हाला रेल्वे रोको करून सरकारचं लक्ष वेधून घ्यावं लागल्याचे कुणाल राऊत यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...