spot_img
अहमदनगरAhmednagar politics: दहा वर्ष रखडलेलं 'ते' काम दोन वर्षात पूर्ण; खासदार विखे...

Ahmednagar politics: दहा वर्ष रखडलेलं ‘ते’ काम दोन वर्षात पूर्ण; खासदार विखे पाटील

spot_img

थिटे सांगवी । नगर सहयाद्री –
नगर करमाळा या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली दहा वर्ष रखडलेले होते. मी खासदार झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षात या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण केले असल्याचे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

ते थिटे सांगवी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी प्रताप भैय्या पाचपुते, सिद्धेश्वर देशमुख, शरद बोटे, डॉ. दिलीप बोस, अर्जुन देवा शेळके, बलभीम आप्पा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार विखे म्हणाले, आमदार बबनदादा पाचपुते व माझ्या माध्यमातून थिटे सांगवी या गावात दोन ते अडीच कोटी रुपये मंजूर करून आज या गावामध्ये मी आलो आहे. यापुढेही असेच विकासासाठी कार्यरत राहू अशी ग्वाही यावेळी खासदार विखे यांनी दिली.

तसेच त्याच बजेट पेठ मधून श्रीगोंदा मतदारसंघासाठी आमदार बबनदादा पाचपुते यांनी २०० कोटी रुपये रस्त्याच्या कामासाठी मंजूर केले असून ज्येष्ठ आमदार म्हणून मतदारसंघाच्या विकासासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत असे मत मांडून खासदारकीच्या माध्यमातून काम करत आज विकासाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो आहे, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाट्न

येणाऱ्या नवीन वर्षामध्ये जानेवारी महिन्यात देशाचे नेते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे नगर बायपास व नगर करमाळा राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपला; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन

मुंबई । नगर सहयाद्री :- धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही...

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; प्रशासनाकडून हिरवा कंदील, आता डबल गिफ्ट मिळणार?

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया...

जय-वीरूसारख्या जिवलग मित्रांनी टोकाचं पाऊल उचल! दोघांनीही केली आत्महत्या, शहरात खळबळ, कारण काय?

Crime News : सोलापूर जिल्ह्यातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. दक्षिण सोलापूर...

उपमुख्यमंत्री अजित दादांच्या शिलेदारांनी फोन फिरवला; मोठा प्रश्न सुटला? नागरिकांनी मानले आभार? शहरात कुणाच्या नावाची चर्चा…

Politics News : कोपरगाव मतदारसंघातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे...