spot_img
महाराष्ट्र'ते' बहुचर्चित महाराज आता मनसेच्या वाटेवर? लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या हालचाली

‘ते’ बहुचर्चित महाराज आता मनसेच्या वाटेवर? लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या हालचाली

spot_img

नाशिक / नगर सह्याद्री : आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आलेल्या आहेत. अनेक आध्यात्मिक गुरू, महंत निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशा चर्चा आहेत. अनेक महाराजही या लोकसभेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. आता बाबाजी भक्त परिवाराचे शांतीगिरी महाराजदेखील रिंगणात उतरणार आहेत. नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर अशा दोनपैकी एका मतदारसंघापैकी एका ठिकाणी ते लढणार असले तरी त्यांनी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वेळ मागितल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणारे आध्यात्मिक गुरू भाजपाकडे असल्याचे दिसते आहे. मात्र, शांतीगिरी महाराज यांनी मनसेकडे कल दाखवल्याचे दिसत आहे. राज ठाकरे नाशिकमध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला असला तरी अद्याप उमेदवारी निश्चित नाही. तुम्ही तयारी करा मी उमेदवारीचे बघून घेईल, असे राज ठाकरे यांनी गेल्या वेळी नाशिकच्या दौऱ्यात घेतलेल्या बैठकीत सांगितले होते. त्यातच आता प. पू. १००८ महामंडालेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांनी नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....