spot_img
अहमदनगरमहापालिकेत 'तो' ठराव मंजूर!! 'अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर'

महापालिकेत ‘तो’ ठराव मंजूर!! ‘अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर’

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आता राज्य शासनाच्या पत्रानुसार नगर महापालिकेच्या महासभेत प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी (दि.१) सायंकाळी मंजूर केला आहे.

अहमदनगरच्या नामांतराचा विषय अनेक वर्षांपासून सुरू आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यानगर नाव देण्याची मागणी पुढे करत महापालिकेला पत्र दिले होते. मात्र, मनपात असलेल्या महाविकास आघाडीच्या सत्ताधार्‍यांनी याबाबत ठराव न करता प्रस्ताव प्रलंबित ठेवला होता.

दरम्यानच्या काळात अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामकरण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केला होता. मात्र, महापालिकेचा ठराव नसल्याने राज्य शासनाला याबाबत पुढील कार्यवाही करता येत नव्हती. आता महापालिकेत प्रशासक राज असून राज्य शासनाने २८ डिसेंबर रोजी महापालिकेला नामांतराचा ठराव करून पाठवण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार प्रशासक जावळे यांनी शुक्रवारी अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर केला. महापालिकेने नामातराचा ठराव केला असून, जिल्हाधिकार्‍यांमार्फत हा ठराव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याचे प्रशासक जावळे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...